Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर मी हिंदू म्हणूनच जगलो असतो’ असे का म्हणाले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर?

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 68वे महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त आज आपण त्यांच्या आणि धर्मानंद कोसंबी यांच्यातील एका दुर्मिळ संभाषणांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2024 | 05:20 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, दलित समाजाचे नेते, कामगार आणि महिलांना महत्वाचे हक्क मिळवून देणारं एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व. त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणत. आज या थोर व्यक्तिमत्वाचे 68वे महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे लाखो अनुयायी आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीला भेट देत असतात.

महाराष्ट्र्राच्या मातीपासून दूर महू नावाच्या मध्यप्रदेशातील गावात जन्माला आलेले डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या मातीत अनेक क्रांतिकारी मोर्चे काढले. आपल्या समाजाला एक माणूस म्हणून जगता यावे यासाठी जंग जंग पछाडले. दलित समाजाचा उद्धार करण्यास त्यांना अनेक दिगज्जांची साथ लाभली. यात राजश्री शाहू महाराजांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याचे कारण म्हणजे महाराजांनी आंबेडकरांना केलेली आर्थिक मदत. याच आर्थिक मदतीमुळे आंबेडकरांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मदत झाली. तसेच ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ नावाची दोन मासिके सुद्धा सुरु करण्यास शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना मदत केली.

दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून खस्ता खाणारे बाबासाहेब!

डॉ. आंबेडकरांनी आपल्या झंझावती आयुष्यात अनेक मंदिर प्रवेशासाठी लढे दिले. त्यातीलच एक विशेष गाजलेला मंदिर प्रवेश लढा म्हणजे 1930 सालचा काळाराम मंदिर प्रवेश लढा. खरंतर हा एक शांत मोर्चा होता, ज्याचा उद्देश फक्त दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा एवढाच होता. पण या मोर्च्याला हिंसक रूप तेव्हा आले जेव्हा सवर्णांनी दलितांवर दगडांचा मारा केला. यात डॉ. आंबेडकरांना सुद्धा जखमा झाल्या. यानंतर मात्र आंबेडकरांचे मन धर्मांतराकडे झुकत चाले होते.

आणि आंबेडकरांनी ती घोषणा केलीच!

एकीकडे गांधीजी सवर्णांचे मन परिवर्तन होईल असे आश्वासन आंबेडकरांना देत होते. पण आता आंबेडकरांना कळून चुकले होते की हिंदू धर्मातून जातीवादाचे उच्चाटन कधीच होणार नाही. त्यांच्या हेच द्वंद्व त्यांनी 1935 येथील येवला येथील सभेत बोलून दाखविले. ” मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही” असे उद्गार आंबेडकरांनी काढले आणि धर्मांतराबाबत आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. यावेळी नक्कीच असंख्य हिंदू मनांना आपलीच भावंडे आपल्यापासून दूर चालली आहे याची ठेच लागली असणार यात काही शंका नाही.

डॉ आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबी यांची भेट

1939 साली डॉ. आंबेडकरांनी धर्मानंद कोसंबी यांची भेट घेतली होती. धर्मानंद कोसंबी हे जन्माने ब्राह्मण, हिंदू पण लहानपणापासूनच त्यांना बौद्ध धर्माची ओढ होती. बौद्ध धर्म जाणून घेण्यासाठी त्यांना लहानपणीच आपल्या घराला राम राम ठोकला. नेपाळ श्रीलंका असा प्रवास करत त्यांनी पाली भाषा समजून घेतली व तेथील लोकांना संस्कृत शिकवले.

असे हे थोर व्यक्तिमत्व मुंबईतील हिंदू कॉलनीत आपल्या कुटूंबाला भेटायला ७-८ दिवस येत असत. असेच एकदा ते आले असताना, त्यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट घेतली होती.

तर मी हिंदू म्हणूनच जगलो असतो!

जेव्हा डॉ. आंबेडकर यांनी धर्मानंद कोसंबी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यात धर्मांतरावरून संभाषण झाले. बोलता बोलता आंबेडकर म्हणाले,” तुम्ही सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे, म्हणून तुमच्या आशिर्वादाला माझ्या लेखी फार मोठे महत्व आहे.”

यावेळी धर्मानंद यांनी आंबेडकरांना सूचक शब्दात सांगितले, “बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याआधीच मी मनाने बौद्ध झालो होतो. पण मी कधी धर्मांतराचा प्रचार केला नाही. हिंदू धर्माचा राग आल्यामुळे मी बौद्ध झालो असे नाही.”

आंबेडकर सुद्धा यावेळी परखडपणे म्हणाले,” माझा हिंदू धर्मावर राग नाही. अन्याय सहन न होऊन कधी कधी मी हिंदू धर्मावर टीका केली आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जातीवाद वगळता हिंदू धर्माची बाकी सर्व प्रमेय आवडतात.

पुढे आंबेडकर म्हणतात,” बौद्ध धर्मात जातीवाद नाही. पण हिंदू धर्मात तो राहिला. जर हिंदू धर्मात जातीवाद नसता तर मी हिंदू म्हणूनच जगलो असतो आणि मेलो असतो. मी हिंद धर्माचा त्याग रागाने नाही तर मजबुरीने करतो आहे.”

सदर लेख हा इंद्रायणी सावकार लिखित ‘संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम’ या पुस्तकातून घेतला आहे.

Web Title: Why did dr babasaheb ambedkar said i would have lived as a hindu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • Ambedkar Mahaparinirvan Din
  • Dr. Babasaheb Ambedkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.