Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : भज्जीने भारत-पाकिस्तान सामन्याला केला विरोध! नक्की काय म्हणाला हरभजन सिंह, वाचा सविस्तर

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवता कामा नये, असे मत माजी अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांनी व्यक्त केले. आशिया कप सामन्यापूर्वी भज्जीने आपले मत व्यक्त केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 12, 2025 | 11:31 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे अनेक क्रिकेट चाहते हे या सामन्याला विरोध करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरीक हे संतापलेले आहेत. त्यानंतर या वादानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडले होते. लेजेंड्स लीगमध्ये झालेल्या सामन्यामध्ये देखील भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्याला विरोध केला होता आणि सामना खेळण्यास नकार दिला होता. 

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवता कामा नये, असे मत माजी अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानमधील आशिया कप सामन्यापूर्वी भज्जीने आपले मत व्यक्त केले. ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने क्रिकेट सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की ते या हाय व्होल्टेज सामन्याला हलके घेण्याची चूक करणार नाहीत.

हरभजन सिंग काय म्हणाला?

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने नेहमीच चर्चेत असतात. पण ऑपरेशन सिंदूर नंतर, सर्वांनी सांगितले की दोन्ही देशांमध्ये क्रिकेट आणि व्यापार होऊ नये. आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स खेळत होतो, पण आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलो नाही.

प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत क्रिकेट आणि व्यापार दोन्ही होऊ नये असे माझे मत आहे. पण हे माझे मत आहे. जर सरकार म्हणत असेल की सामना व्हायला हवा तर तो खेळवला पाहिजे. पण दोन्ही देशांमधील संबंध सुधारले पाहिजेत.

भारतीय क्रिकेट एक वेगळ्या पातळीवर

भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली गेल्यानंतरही संघ मजबूत आहे. एका सोसायटी मॅगझिन कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना भज्जी म्हणाले, ‘जर कोणी भारतीय संघाला हरवू शकते तर ते स्वतः टीम इंडिया आहे. हा खूप मजबूत संघ आहे. आमचे क्रिकेट वेगळ्या पातळीचे आहे. विराट आणि रोहित निवृत्त झाले असले तरी, संघ खूप मजबूत आहे.’

टीम इंडिया आशिया कप जिंकणार

भज्जी म्हणाला, ‘दुबईमध्ये खेळणे घरासारखे वाटते. फिरकीपटूंची भूमिका मोठी आहे आणि मला आशा आहे की भारतीय संघ जेतेपदासह परत येईल.’

Web Title: Asia cup 2025 harbhajan singh opposed the india vs pakistan match what exactly did harbhajan singh say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Harbhajan Singh
  • IND VS PAK
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
1

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?
2

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली
3

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?
4

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.