Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG VS IND : जसप्रीत बुमराला का कर्णधार बनवले नाही? अजित आगरकर यांनी सांगितले कारण

बुमराह याला भारतीय संघाचे कर्णधार पद मिळणार असे म्हटले जात होते पण भारतीय संघाचे कर्णधार पद हे जसप्रीत बुमराहला का देण्यात आले नाही या मागचे कारण देखील आता बीसीसीआयचे सिलेक्टर अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 24, 2025 | 04:37 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

जसप्रीत बुमराह – अजित आगरकर 20 जून पासून भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटची धुरा कोण सांभाळणार यावर मोठे प्रश्नचिन्ह होते. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार होता पण त्याने आता टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे आता कसोटी क्रिकेटची कमान कोणाच्या हाती द्यायची यावर बीसीसीआयला मोठी चर्चा करावी लागली. आज भारतीय संघाचा नवा कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये शुभमन गिल याला भारतीय संघाचा नवा करण्यात म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

जसप्रीत बुमराह याला भारतीय संघाचे कर्णधार पद मिळणार असे म्हटले जात होते पण भारतीय संघाचे कर्णधार पद हे जसप्रीत बुमराहला का देण्यात आले नाही या मागचे कारण देखील आता बीसीसीआयचे सिलेक्टर अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना विचारण्यात आले की बुमराह नेतृत्वाच्या भूमिकेत का नाही. यासोबतच त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे असे निवडकर्ता अजित आगरकर याने स्पष्ट केले. 

कॅप्टन शुभमन गिलची आव्हान सुरु! WTC फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी लढावे लागणार या संघाशी, वाचा संपूर्ण वेळापत्रक

उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले, ‘मला वाटत नाही की बुमराह सर्व ५ सामन्यांसाठी उपलब्ध असेल.’ जरी तो ३ ते ४ कसोटी सामने खेळला तरी बुमराह आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू असेल. तो या संघाचा भाग आहे याचा मला आनंद आहे. यावरून हे स्पष्ट होते की बुमराह त्याच्या फिटनेसमुळे कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे पडला.

Managing workload for our match-winner! Here’s what #AjitAgarkar had to say about #JaspritBumrah. 💪 Catch all the expert reactions LIVE on FOLLOW THE BLUES. WATCH NOW – https://t.co/NRFPxrOgb1#ENGvIND pic.twitter.com/f6eydiyajP — Star Sports (@StarSportsIndia) May 24, 2025

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी मालिका बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळली. जिथे जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार होता. रोहित शर्मा खेळला नसताना बुमराहने पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये टीम इंडियाने एक सामना जिंकला आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. खराब तंदुरुस्तीमुळे बुमराह शेवटचा संपूर्ण कसोटी सामना खेळू शकला नाही. या कारणास्तव, आता जसप्रीत बुमराहची नेतृत्व भूमिकेसाठी निवड झालेली नाही. टीम इंडिया आता त्याला फक्त एक खेळाडू म्हणून खेळवू इच्छिते.

Web Title: Eng vs ind why wasnt jasprit bumrah made captain ajit agarkar explained the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • cricket
  • India vs England
  • Jasprit Bumrah
  • Team India

संबंधित बातम्या

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल
1

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?
2

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित
3

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
4

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.