
फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
Mumbai Indians vs Gujarat Titans pitch report : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे या सामन्यात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल तर गुजरात टायटनचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे मैदान उच्च धावसंख्या असलेल्या सामन्यांसाठी ओळखले जाते.
गुजरात आणि पंजाब यांच्यामध्ये सामना देखील याच मैदानावर खेळवण्यात आला होता. यावेळी या सामन्यातही झलक दिसून आली होती. पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यामधील झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने २४३ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ अगदी जवळ पोहोचला होता पण विजय मिळवू शकला नाही कारण म्हणजेच गुजरात टायटनची निराशाजनक फलंदाजी. आजच्या सामन्यात गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल असणार की फलंदाजांसाठी अनुकूल असणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत एकूण आठ सामन्यात खेळवण्यात आले आहेत. यामध्ये सहा सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकता आला आहेत. तर त्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता पुन्हा एकदा उच्च धावसंख्या असलेल्या आज सामना अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर २२० ते २३० ही धावसंख्या सामान्य धावसंख्या मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ गोलंदाजी करणे पसंत करेल, कारण नंतर फलंदाजी करणे सोपे जाते त्याचवेळी पहिल्या इनिंगमध्ये खेळपट्टीवरील उसळी वेगवान गोलंदाजांना मदत देखील होऊ शकते.
Clash of Gen GOLD & BOLD Captains! 💥
With 5 intense battles so far, it’s #GT leading the charge 3-2! Can @hardikpandya7‘s #MI flip the script against @ShubmanGill‘s Titans at Ahmedabad? Or will GT’s explosive firepower reign supreme? 🔥🏏#IPLonJioStar 👉 #GTvMI | SAT, 29th… pic.twitter.com/tbO4wRcTMS — Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
हवामानाबद्दल बोललो तर, आज अहमदाबादमध्ये थोडे गरम असू शकते. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तथापि, सामन्यादरम्यान घसरण दिसून येते. जर वाऱ्याचा वेग ताशी १० ते १५ किमी असेल तर आर्द्रता पातळी १८ टक्क्यांपर्यंत असू शकते. सध्या पावसाबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, परंतु दव येथे आपली भूमिका बजावू शकते. अंदाजानुसार, दुसऱ्या डावात दवाचा परिणाम खेळपट्टीवर दिसून येईल. अशा परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. पहिल्या सामन्यातही गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.