
IND vs AFG: अभिषेक शर्मा आणि इशान किशनच्या वादळात अफगाणिस्तानचा धुव्वा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
१५६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनने कमालीचा खेळ दाखवला आणि भारताला अत्यंत सुरक्षितपणे जिंकण्याचा उंबरठ्यावर आणले. हा सामना भारतीय संघाने विकेट्सने जिंकला. पॉवरप्लेमध्येच भारताने ८२ धावा कमावल्या होत्या. त्यामुळे केवळ १३.४ ओव्हरमध्येच भारताने हा सामना आपल्या खिशात घातला.
India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
वैभव सूर्यवंशीला डावलून संजू सॅमसनला आज खेळण्यासाठी मैदानात कर्णधार श्रेयस अय्यरने उतरवले. मात्र केवळ १० धावा करून संजू सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि चाहत्यांना पुन्हा एकदा निराश केले. मात्र सुरूवातीपासून अभिषेक शर्माने सामन्यावर मजबूत पकड ठेवली आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अजिबात डोकं वर काढू दिलं नाही.
संजू सॅमसन गेल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला आणि अभिषेकनंतर इशान किशन आक्रमक फलंदाजी करताना दिसला. दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांना सामन्यात मजा आणून दिली. अभिषेक शर्माने तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. केवळ ३२ चेंडूमध्ये त्याने ८२ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरशः त्याने रडवले. एका ओव्हरमध्ये तर तब्बल २६ धावा त्याने एकट्याने कुटल्या. अभिषेक पाठोपाठ इशान किशनदेखील ४२ धावांवर आऊट झाला. रशीद खानने एका हाताने कमालीचा कॅच पकडत चाहत्यांचे मन जिंकून घेतले. हा कॅच अत्यंत कठीण होता.
या सामन्यात अर्शदीपने भारतासाठी तीन बळी घेतले. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराने नाणेफेकीदरम्यान जाहीर केले की वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नाही, तर जसप्रीत बुमराह संघात परतला आणि त्यानेही पहिल्याच षटकात पहिली विकेट घेत भारताला चांगली सुरूवात करून दिली. याशिवाय वरूण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली.