
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा जानेवारी २०२७ मध्ये नियोजित आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याची सुरुवात नागपूर येथे होईल. पहिला कसोटी सामन्याला २१ जानेवारीपासून सुरुवात होईस. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने या मैदानावर सात कसोटी सामने खेळले आहे. यात त्यांनी पाच सामने जिंकले आहेत तर एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. हे मैदान एक ऐतिहासिक ठिकाण असून, भारताने येथे ३५ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने १६ कसोटी सामने जिंकले असून सात गमावले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथील डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर खेळली गेलेली एकमेव कसोटी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती, ज्यात भारताचा पराभव झाला होता. चौथी कसोटी रांचीमध्ये खेळवली जाईल. हा सामना १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर आयोजित केला जाईल. भारताने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना अनिर्णित राहिला आहे.
मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने या मैदानावर १६ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी १० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने चार सामने जिंकले असून दोन गमावले आहेत.
अश्मिता चलिहाचा धमाका! Korea Masters Super 300 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश