
अन्वय द्रविड आणि यशवर्धन चौहानने केली कमाल (फोटो सौजन्य - X.com)
या सामन्यात वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने भारतासाठी डावाची सुरुवात केली. त्याने २६ चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकारांसह २८ धावांवर तो बाद झाला. पावसामुळे सामना ५० षटकांऐवजी २० षटकांचा करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही संघांना आपल्या रणनीतीत थोडा बदल करावा लागला.
राहुल द्रविडचा मुलगा, अन्वय द्रविड, भारतासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने दोन चौकार आणि तीन षटकारांसह १८ चेंडूंमध्ये ३८ धावांची वेगवान आणि उपयुक्त खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट २११ होता. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत सहा गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघ सात गडी गमावून केवळ १७५ धावाच करू शकला आणि सात धावांनी पराभूत झाला.
आर्यवीर आणि अन्वय दोघेही सध्या क्रिकेट विश्वास चर्चेचा विषय आहेत. केवळ आपल्या वडिलांच्या नावावर नाही तर आपल्या खेळीच्या जोरावर पुढे येताना दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरच नाही तर आता राज्य स्तरावरही दोघांच्या खेळाचा बोलबाला दिसून येत आहे.
Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
यशवर्धन चौहानने भारतासाठी सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याने आपल्या ३४ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. अन्वयसोबत मिळून त्यांनी पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीने भारताला सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, कारण एके वेळी भारताने १२ षटकांत ८८ धावांत चार गडी गमावले होते. ऑस्ट्रेलियासाठी ऑफ-स्पिनर एली ब्रेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २९ धावा देऊन २ बळी घेतले.
१८३ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली. संघाच्या सलामीच्या चार फलंदाजांपैकी तिघांनी ४० किंवा त्याहून अधिक धावा केल्या. कर्णधार जॅक जोसानेकने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २७ चेंडूंमध्ये ५५ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या ११ चेंडूंमध्ये २४ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत, त्याने सलग ३ चौकार मारून २५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती आणि वेगवान गोलंदाज मोहित उल्वाने केवळ ३ धावा देऊन भारताचा विजय निश्चित केला.
Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?