Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : कसोटी मालिकेत धोक्याची स्थिती… तरीही जसप्रीत बुमराह 5 व्या सामन्यातून का बाहेर? प्रशिक्षकांने सांगितले कारण

जसप्रीत बुमराह या सामन्याचा भाग नाही. बुमराहने मालिकेत एकूण तीन सामने खेळले. इंग्लंड 2-1 ने पुढे आहे आणि ही मालिका भारतासाठी धोक्यात आहे. इतका महत्त्वाचा सामना असूनही, जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 01, 2025 | 09:12 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ओव्हल कसोटी 31 जुलैपासून सुरू झाली आहे.
  • भारताच्या संघासाठी हा मालिकेचा पाचवा सामना जिंकणे गरजेचे आहे.
  • पाचव्या सामन्यामधून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये 31 जुलैपासुन सामना सुरु झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वी कसोटीचा पहिला दिवस संपला आहे. भारताच्या संघाने या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये चार बदल केले आहेत. भारताच्या संघामध्ये जसप्रीत बुमराह याला बाहेर केले आहे तर त्याच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णा याला संधी मिळाली आहे, त्याचबरोबर शार्दुल ठाकुरच्या जागेवर करुण नायर याला संधी मिळाली आहे. आकाशदीपचे देखील संघामध्ये पुनरागमन झाले आहे. 

जसप्रीत बुमराह या सामन्याचा भाग नाही. बुमराहने मालिकेत एकूण तीन सामने खेळले. इंग्लंड 2-1 ने पुढे आहे आणि ही मालिका भारतासाठी धोक्यात आहे. इतका महत्त्वाचा सामना असूनही, जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली. आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी बुमराहला वगळण्याचे कारण सांगितले आहे.

जसप्रीत बुमराह का खेळत नाहीये?

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर, पत्रकार परिषदेत रायन टेन डोइशेटला बुमराह खेळत नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. रायन म्हणाला की बुमराहने खूप षटके टाकली आहेत आणि त्याच्या शारीरिक स्थितीचा आदर करणे महत्वाचे आहे. तो म्हणाला, ‘जसप्रीत बुमराहला खूप गुंतागुंतीची समस्या आहे. आम्हाला त्याच्या शरीराच्या स्थितीचा आदर करायचा आहे. त्याने खूप षटके टाकली आहेत. मला माहित आहे की ते असे वाटणार नाही कारण त्याने फक्त तीन कसोटी सामने खेळले आणि मँचेस्टरमध्ये फक्त एकाच डावात गोलंदाजी केली.’

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फक्त ३ सामने खेळले असले तरी, त्याने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १४ वेळा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आहे, ज्यामध्ये दोन वेळा ५ बळींचा समावेश आहे. या मालिकेत बुमराहची सरासरी २६.०० आहे. मोहम्मद सिराजनेही १४ बळी घेतले आहेत परंतु बुमराहने त्याच्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत. यावरून बुमराहचा कसोटीत काय प्रभाव आहे हे दिसून येते.

ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला. तरीही, खेळाचे ६४ षटके खेळले गेले. भारत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि दिवसअखेर त्यांनी ६ विकेट गमावून २०४ धावा केल्या. दरम्यान, साई सुदर्शनने ३८ धावा केल्या आणि करुण नायरने अर्धशतक झळकावले. नायर अजूनही नाबाद आहे आणि दुसऱ्या दिवशी तो वॉशिंग्टन सुंदरसह संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करू शकतो.

 

Web Title: Ind vs eng dangerous situation in the test series why is jasprit bumrah still out of the 5th match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • cricket
  • Jasprit Bumrah
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
1

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
2

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
3

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
4

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.