Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : ..तर लॉर्ड्सवर टीम इंडियाच ठरली असती विजेती; इंग्लंडविरुद्ध या ५ चुका गिलसेनेला पडल्या महागात

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. हातात असणारा विजय गमवाव्या लागणाऱ्या भारताला पाच चुका महागात पडल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 15, 2025 | 04:40 PM
IND vs ENG: ..then Team India would have been the winner at Lord's; These 5 mistakes cost Gilsena dearly against England

IND vs ENG: ..then Team India would have been the winner at Lord's; These 5 mistakes cost Gilsena dearly against England

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. आता इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रापर्यंत टीम इंडियाचा विजय सुकर वाटत होता. परंतु टीम इंडियाने फलंदाजीला सुरवात करताच सामना हळूहळू इंग्लंडच्या बाजूने झुकू लागला होता. हातात असणारा विजय भारताला कसा गमवावा लागाला भारतीय संघ कुठे चुकला? याबाबत आतापण माहिती करून घेऊया.

आकाश दीपला नाईट वॉचमन बनवणे पडले महागात

टीम इंडियाची तिसरी विकेट चौथ्या दिवशी पडली होती. तेव्हा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतऐवजी आकाश दीपला नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. आकाश दीपकडून अशी अपेक्षा करण्यात आली होती कि, तो चौथा दिवसाचा खेळ खेळून काढले. परंतु वास्तवात तसे काही झाले नाही. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आकाश दीपला बाद केले. जर त्याच्या जागी एखादा फलंदाज आला असता तर त्याने त्याची विकेट वाचवून ठेवली असती.

हेही वाचा : संसदेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक येणार.., केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती; काय असणार तरतुदी?

शुबमन गिलची खराब फलंदाजी

भारतीय कर्णधार शुभमन गिलची फलंदाजी देखील टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरली आहे. सध्या तो टीम इंडियाचा भरवाशाचा फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. त्याने एजबॅस्टन आणि लीड्स कसोटीतही आपली शानदार फलंदाजी दाखवून दिली. पण लॉर्ड्स कसोटीत मात्र त्याला धावा काढता आल्या नाहीत.त्याने या सामन्याच्या दोन्ही डाव मिळून एकूण २२ धावा केल्या.

शेवटच्या ४ विकेट्स फक्त ११ धावांत गेल्या

पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात टीम इंडियाने देखील पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. खरं तर टीम इंडिया त्यांच्या पहिल्या डावात सहज ४०० पार जाऊ शकली असती. पण पहिल्या डावात भारताने शेवटचे ४ विकेट्स फक्त ११ धावांत गमावले आणि भारत ३८७ पर्यंतच पोहचू शकला.

अतिरिक्त धावांनी घात केला..

टीम इंडियाने इंग्लिश संघाला दिलेल्या अतिरिक्त धावा हे देखील भारताच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. भारतीय संघाने दोन्ही डावात एकूण ६३ अतिरिक्त धावा दिल्या आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघाने या सामन्यात केवळ ३० धावा मोजल्या. टीम इंडियाला २२ धावांनी सामना गमवावा लागला. यामुळेच इंग्लिश संघाने हा सामना सहज आपल्या खिशात टाकला.

केएल राहुलचे ढिसाळ क्षेत्ररक्षण

भारताचा सतार फलंदाज केएल राहुलने लॉर्ड्स कसोटीत आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. परंतु, क्षेत्ररक्षण करताना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या डावात राहुलने विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथचा झेल सोडला. त्यावेळी स्मिथ फक्त ५ धावा काढून खेळत होता. त्यानंतर, त्याने ५१ धावा केल्या.

हेही वाचा : Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी

ऋषभ पंतची आत्मघातकी धाव

पहिल्या डावात ऋषभ पंतचे धावबाद होणे भारताच्या पराभवाचे एक कारण ठरले आहे. त्याने पहिल्या डावात ७४ धावा केल्या आणि केएल राहुलला शतक झळकावण्यास मदत करतेवेळी तो धावबाद होऊन माघारी परतला. त्याच्या जाण्याने टीम इंडियाच्या स्कोअरबोर्डचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Ind vs eng then team india would have been the winner at lords these 5 mistakes cost gilsena dearly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Akash Deep
  • ben stokes
  • IND Vs ENG
  • KL Rahul Captain
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Photos : आशिया कपमध्ये भारताचे ‘हे’ खेळाडू दाखवतील जादू! स्पर्धेपूर्वीच दिनेश कार्तिकने वर्तवली भविष्यवाणी
1

Photos : आशिया कपमध्ये भारताचे ‘हे’ खेळाडू दाखवतील जादू! स्पर्धेपूर्वीच दिनेश कार्तिकने वर्तवली भविष्यवाणी

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट
2

रोहित शर्मा आणि शुभमन गिल बंगळुरूला पोहोचले! ‘या’ खेळाडूसह होणार ‘COE’ मध्ये फिटनेस टेस्ट

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  
4

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.