Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 

भारताला दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावांनी सामना गमवावा लागल्याने भारतीय संघावर आणि संघ व्यवसस्थापनावर टीका होत आहे. आता माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाने देखील टीका केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 08:00 PM
IND vs SA 2nd T20: 'This was India's mistake...', Former Indian batsman criticizes coach Gautam Gambhir's strategy.

IND vs SA 2nd T20: 'This was India's mistake...', Former Indian batsman criticizes coach Gautam Gambhir's strategy.

Follow Us
Close
Follow Us:

Robin Uthappa criticizes Gautam Gambhir : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दूसरा टी 20 सामना गमावला. त्यानंतर भारतीय संघावर आणि संघ व्यवसस्थापनावर टीका होऊ लागली आहे. अशातच आता माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजीच्या रणनीतीबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाल की, डावाच्या सुरुवातीला जास्त लवचिकतेमुळे धावा काढणे कठीण होऊन जाते. गुरुवारी मुल्लानपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १९.१ षटकांत १६२ धावांतच आटोपला.

हेही वाचा : Lionel Messi In India : 3 दिवस, 4 शहरे… लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात होणार

रॉबिन उथप्पा म्हणाला आय, समस्या सुरुवातीच्या विकेट्सची नव्हती, तर शुभमन गिल बाद झाल्यानंतर स्वीकारलेल्या रणनीती होती. भारताची फलंदाजी मजबूत असली तरी संघाला त्याचा प्रभावीपणे वापर करता आलेला नाही. तो म्हणाला की, “जेव्हा शुभमन गिल बाद झाला तेव्हा अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी त्याला अशा फलंदाजाची भूमिका बजावावी लागली जो जोखीम घेऊन अभिषेक शर्मावरील दबाव कमी करण्यासाठी जलद धावा काढण्याचा प्रयत्न करेल.”

उथप्पाच्या मते अक्षरची २१ धावांची संथ खेळी दबाव कमी करण्यासाठी अपयशी ठरली. ज्यामुळे त्याच्याभोवती विकेट पडल्या आणि रणनीतीत मोठा बदल झाल्याचे दिसले. यामुळे पाठलाग आणखी संथ झाला. रॉबिन म्हणाला  की “आंतरराष्ट्रीय स्तरावर, फलंदाजांनी त्यांच्या भूमिका आणि डाव कसा पुढे नेट राहायचा याची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे.”

हेही वाचा : IND vs SA 3rd T20 : मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघ पोहोचला धर्मशाळेत, सूर्याची सेना आज सराव करणार

रणनीतीमध्ये लवचिकता ठीक

रॉबिन उथप्पा म्हणाला की, “पहिल्या सहा ते आठ षटकांनंतर रणनीतीमध्ये लवचिकता ठीक आहे, परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मजबूत पाया आवश्यक आहे. मजबूत पायाशिवाय तुम्हाला  गगनचुंबी इमारत उभारता येत नाही.” तसेच तो पुढे म्हणाला की, “एकाच सामन्यात खेळाडूंनी अनेक भूमिका बजावण्याची अपेक्षा करण्यात आल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या होत जातात  आणि इथेच भारत अपयशी ठरला.”

Web Title: Ind vs sa 2nd t20 former batsman robin uthappa targets coach gautam gambhirs strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • Robin Uthappa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

Gautam Gambhir च्या डीप फेक प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काय दिला निकाल? AI बाबतही केलं मोठं विधान
1

Gautam Gambhir च्या डीप फेक प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काय दिला निकाल? AI बाबतही केलं मोठं विधान

BCCI ने दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी केली भारतीय संघाची घोषणा, अनुष्का शर्मा आणि काश्वीला मिळाली संधी
2

BCCI ने दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी केली भारतीय संघाची घोषणा, अनुष्का शर्मा आणि काश्वीला मिळाली संधी

Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव; अडीच कोटींच्या मानहानीचा दावा
3

Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव; अडीच कोटींच्या मानहानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.