
IND vs SA T20I series: Who will open with Abhishek Sharma? Captain Surya directly revealed the name....
IND vs SA T20I series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ टी २० सामन्यांची मालिका ९ डिसेंबरपासून खेळली जाणार आहे. कटकमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामन्या खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदे घेतली आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मुख्य चर्चा सलामीवीर कोणाला संधी द्यायची यावर बेतलेली होती. संजू सॅमसन की शुभमन गिल या पैकी कोण अभिषेक शर्मासोबत सलामीला उतरणार आहे? यावर सूर्याने त्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
हेही वाचा : Ashes मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टार कॅप्टनचा मोठा निर्णय! रेड बॉल क्रिकेटला केला अलविदा
२०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी, भारतीय संघाने या मालिकेसाठी आपल्या संघाच्या संघावर लक्ष केंद्रित केले आहे. सूर्यकुमार म्हणाला की संघात जास्त बदल करायचे नाहीत. केवळ खेळण्याच्या शैली आणि सामन्याच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करणार अहोत. तो सूर्या म्हणाला की, “आम्ही संघात जास्त बदल करणार नाही. आमचे लक्ष केवळ आम्हाला कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे यावर आहे.”
संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांच्यापैकी कोण सलामीला येईल असा प्रश्न विचरला असता कर्णधाराने सांगितले की दोन्ही खेळाडूंना संघात स्थान आहे आणि ते लवचिक आहेत. संजू सॅमसनबाबत बोलताना तो म्हणाला की, “संजू हा एक फलंदाज आहे जो वरच्या क्रमाने खेळण्याची शक्यता आहे. त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली असून शुभमन संजूच्या आधी खेळला कारण तो त्या स्थानासाठी पात्र होता, परंतु आम्ही खात्री केली आहे की, संजूलाही संधी मिळणार.” या विधानावरून स्पष्ट होते की कर्णधाराला दोन्ही खेळाडूंवर विश्वास असून तो संघात संतुलन ठेवण्याची इच्छा ठेवतो.
फलंदाजी क्रमाबद्दलच्या प्रश्नांबाबत उत्तर देताना सूर्या म्हणाला की सलामीवीरांव्यतिरिक्त इतर खेळाडूंना लवचिक राहून परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. तो म्हणाला की, “हे दोघे (गिल आणि संजू) आमच्या योजनेचा भाग असून ते अनेक भूमिका निभावू शकतात. हे संघासाठी एक संपत्ती आहे.”
कर्णधाराने असे देखील म्हटले की, टी-२० विश्वचषकापूर्वी संघाचे दोन मजबूत संघांविरुद्ध १० टी-२० सामने होणार आहेत. म्हणूनच, सध्या त्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि स्पर्धा जवळ येत असताना, संघ हळूहळू आपले लक्ष विश्वचषकाकडे वळवेल.