
फोटो सौजन्य - Proteas Men सोशल मिडिया
India vs South africa Match Highlights : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने वळला. भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले. भारताच्या संघाला या पराभवाची मोठी किम्मत मोजावी लागणार आहे. या पराभवानंतर भारताच्या संघाला उर्वरित दोनही सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर ईशान किशन शून्यावर बाद झाला तर तिलक वर्मा देखील फार काही करू शकला नाही तो पहिला चेंडूवर मोठा शॉर्ट खेळण्यासाठी गेला आणि विकेट गमावली. अभिषेक शर्माने या सामन्यांमध्ये विश्वचषकातील त्याचे खाते उघडले आहे तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने या सामन्यांमध्ये 15 धावा केल्या. भारतीय संघाची आक्रमक शैली आजच्या सामन्यात त्यांना महागात पडली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा 18 धावा करून कॉर्बिन बॉश त्याच्या हातात विकेट दिली.
SL vs ENG : इंग्लंडच्या संघाने हिसकावला श्रीलंकेच्या हातून विजयाचा खास! 51 धावांनी मिळवला विजय
तर अक्षर पटेल च्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारा वॉशिंग्टन सुंदर देखील स्वस्तात बाद झाला. भारतीय संघाचा पुढील सामना हा वेस्टइंडीज विरुद्ध होणार आहे आणि तो समना भारतीय संघासाठी विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे. हार्दिक पांड्यादेखील फार काही करु शकला नाही, त्याने 18 धावा केल्या आणि विकेट गमावली. आजच्या भारताच्या खराब फलंदाजीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Statement win from South Africa 👊 The Proteas seal a crucial victory over co-hosts India in the #T20WorldCup Super 8 💥 📝: https://t.co/LiaV4FSoFf pic.twitter.com/IeHZ2gSRRs — ICC (@ICC) February 22, 2026
भारताची नववी विकेट पडली आहे. शिवम दुबे ३७ चेंडूत ४२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे, ज्यामुळे भारतीय संघ पूर्णपणे गोंधळलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला आहे. शेवटची विकेट पुढच्याच चेंडूवर पडली. मार्को यान्सन याने संघासाठी 4 विकेट्स नावावर केले तर केशव महाराज याने संघाला 3 विकेट्स मिळवून दिले. काॅर्बिन बाॅशने 2 विकेट्स नावावर केले तर एडन मार्करम याने संघाला पहिला विकेट मिळवून दिला आणि भारताचा संघ पूर्णपणे खचला.