
India vs Sri lanka in Women's Asia Cup Final 2026
US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला
दुसऱ्या उपांत्य सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १३०/५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने १८.४ षटकांत ६ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावून १३० धावा केल्या. संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती आणि १७ षटकांत पाकिस्तानने ५ विकेट्स गमावून केवळ ९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार फातिमा सनाने शानदार फलंदाजी करत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३६ चेंडूंमध्ये ४७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तिला टुबा हसनने साथ दिली, जी १२ धावांवर नाबाद राहिली. या दोन फलंदाजांनी शेवटच्या २४ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ३८ धावांची अभेद्य भागीदारी केली, ज्यामुळे पाकिस्तान संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. कर्णधार चमारी अथापट्टूने श्रीलंकेकडून २ विकेट्स घेतले.
१३१ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात फातिमा सनाने कर्णधार चमारी अटापट्टू आणि संजना कविंदी यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून श्रीलंकेला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. सहाव्या षटकापर्यंत श्रीलंकेचे चार फलंदाज ३३ धावांवर बाद झाले होते. सुरुवातीच्या या धक्क्यांनंतर हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहरी यांनी डाव सावरला. हर्षिताने ३६ आणि कविशाने ३३ धावा केल्या आणि या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेरीस, फातिमा सनाने त्या दोघींना बाद करून श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद १०९ वर आणली, पण तोपर्यंत सामना पाकिस्तानच्या हातातून निसटला होता. नीलाक्षी सिल्वा १० चेंडूंमध्ये १८ धावांवर नाबाद राहिली. फातिमा सनाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. महिला आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने याच स्टेडियमवर खेळले गेले आहेत. सामना १३ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही सामन्याचे थेट प्रक्षेपणकेले जाईल.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ३१ सामने खेळले आहेत. भारताने २५ सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. भारताला पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांमधील एक सामना रद्द झाला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताचेच पारडे जड असेल. महिला टी-२० आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामने खेळले गेले आहेत. भारताने चार सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे. २०२४ मध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते.