
india w beat bangladesh w
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेली सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या २ धावांवर बाद झाली. यानंतर, तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज प्रतीका रावल २४ चेंडूंमध्ये केवळ २० धावाच करू शकली. टीम इंडियाची स्टार सलामीवीर शफाली वर्माने शानदार फलंदाजी करत ४० चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या. १६० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना तिने ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
कर्णधार हरमनप्रीत कौरने २८ चेंडूंमध्ये केवळ २४ धावा करून तंबूत परतली. विकेटकीपर-फलंदाज रिचा घोषने २१ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या दीप्ती शर्माने अवघ्या सहा चेंडूंमध्ये १३ धावा करून भारतीय संघाला २० षटकांच्या अखेरीस १४९ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. बांग्लादेशकडून सुलताना खातूनने दोन विकेट्स घेतले.
India Women are into the Asia Cup Final! 🔥🇮🇳 India defeated Bangladesh by 40 runs! They will face either Sri Lanka or Pakistan in the final this coming Sunday! 🏆#WomensAsiaCup pic.twitter.com/OzrYfvq5QJ — 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) September 10, 2026
१५० धावांचे लक्ष्य गाठताना बांग्लादेश महिला क्रिकेट संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, श्री चरणीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला सामन्यात आघाडी घेण्यापासून रोखले. बांग्लादेशची सलामीवीर दिलारा अख्तरने २१ धावा केल्या, तर शोभना मोस्तारीने १८ धावांची भर घातली. कर्णधार निगार सुलतानानेही १९ धावा जोडल्या, त्यानंतर शोर्ना अख्तरने नाबाद २२ धावा केल्या. दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतले, तर नंदिनी शर्मानेही २ विकेट्स घेतले. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनीही प्रत्येकी १ विकेट्स घेतला.
बांग्लादेश संघ २० षटकांत ७ विकेट्स गमावून केवळ १०९ धावाच करू शकला. यामुळे भारतीय संघाने ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
जलवा है भाई का! 13 वर्षांनी ईशान किशनने ईस्ट झोनला जिंकवले; Duleep Trophy 2026 वर कोरले नाव