
पहिल्या सराव सामन्यात यशस्वी सपशेल अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टला सुरू होईल. त्यापूर्वी, टीम इंडियाने तीन दिवसीय सराव सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवले. श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जिवंत ठेवायची असेल तर त्यांना निर्भेळ विजय मिळवणे आवश्यक आहे.
श्रीलंकेने आपला डाव ८ गडी बाद ३६३ धावांवर घोषित केला. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने आपला डाव ८ गडी बाद ३६३ धावांवर घोषित केला. श्रीलंकेच्या तीन खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. सलामीवीर रविंदू रसंथाने १४३ चेंडूंमध्ये ७१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. त्याचा साथीदार निशान मदुशंकानेही ६५ चेंडूंमध्ये ६६ धावांची वेगवान खेळी केली.
या दोघांसोबत कर्णधार सोनल दिनुशानेही ७१ चेंडूंमध्ये ५२ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त, पवन रत्नायकेने ३९ आणि पसिंदू सुरियाबंदाराने ३५ धावा केल्या, तर अहान विक्रमसिंघेने ३१ आणि रमेश मेंडिसने ३२ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर गुरनूर ब्रारने एक बळी घेतला. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि सारांश जैन यांना एकही बळी मिळाला नाही. यामुळे आता भारत नक्की कशी कामगिरी पडणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट टीम खेळताना खूपच चुकाही करत असल्याचे दिसून येत आहे. असे खेळल्यास, WTC मधून भारतीय टीम बाहेर पडेल असेच चित्र सध्या समोर दिसत आहे.
IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप