
शेफाली वर्माने रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अर्धशतक पूर्ण करून, शेफाली वर्मा महिला टी२० आशिया कपच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करणारी फलंदाज ठरली. २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून, तिने आपली सहकारी स्मृती मंधानाचा विक्रम मोडला, जिने २०२२ मध्ये सिल्हेट येथे श्रीलंकेविरुद्ध २५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मृती मंधाना या सामन्यात तिच्यासह खेळत होती आणि तिच्यासमोरच तिने हा रेकॉर्ड मोडला आहे. या यादीत रिचा घोष आणि शेफाली वर्मा प्रत्येकी २६ चेंडूंमध्ये दोन अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानावर बरोबरीत आहेत. शेफाली वर्मा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही कमालीची करत असून तिने नेहमीच महिला भारतीय टीममध्ये चांगले योगदान दिले आहे.
महिला आशिया कप फायनलमध्ये भारत श्रीलंका येणार आमनेसामने! जेतेपदासाठी लढणार दोन्ही संघ