
IND W vs SL W Asia cup Final
सात वेळा चॅम्पियन ठरलेला भारतीय संघ महिला टी-२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत आहे. भारतीय महिला संघाने आशिया कपमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. एकदिवसीय असो वा टी-२०, भारतीय संघ या स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारात नेहमीच विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे. भारताने सर्वाधिक सात वेळा विजेतेपद पटकावले असून, आता तो आपल्या आठव्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील २०२४ मध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात, श्रीलंकेने भारताला पराभूत करून एक मोठा उलटफेर करत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे भारतीय संघाला त्या पराभवाचा बदला घेण्याची ही एक सुवर्णसंधी असेल.
महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने २५ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने फक्त पाच सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. याशिवाय, महिलांच्या आशिया कपमध्ये भारताने श्रीलंकेवर वर्चस्व गाजवले आहे. आशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये सहा सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने चार आणि श्रीलंकेने फक्त एक सामना जिंकला आहे.
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, गुणालन कमलिनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चर्नी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा
श्रीलंका: चमारी अट्टापट्टू (कर्णधार), इमिशा दुलानी, विश्मी गुणरत्ने, हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, नीलाक्षिका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, चामुडी प्रबोदा, मिताली अयोध्या