Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War : भारताने २५ पाकिस्तानी खेळाडूंचे वाजवले बारा! ‘या’ मोठ्या स्टेडियमने घेतला टोकाचा निर्णय…

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हळहळू कमी होत असला तरी पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंचे भारताविरुद्ध गरळ ओकणे थांबत नाही आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेडियमने एक मोठे पाऊल उचलले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 20, 2025 | 08:43 AM
India sacked 25 Pakistani players! 'This' big stadium took a drastic decision...

India sacked 25 Pakistani players! 'This' big stadium took a drastic decision...

Follow Us
Follow Us:

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हळहळू निवळत असल्याचे चित्र आहे. पहालगाम हल्ल्यांतर या दोन देशातील तणाव वाढला होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून २६ भारतीय पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले होते.

या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण शिगेला पोहोचले होते. त्याचा थेट परिणाम क्रिकेट या खेळावर देखील दिसून आला. या काळात, दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या, राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून  (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

हेही वाचा : LSG vs SRH : लखनऊच्या प्लेऑफच्या आशा झाल्या नष्ट! SRH ने LSG ला 6 विकेट्सने केले पराभूत

नेमकी काय कारवाई?

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आगपाखड केली होती. त्यामुळे आता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमने एक मोठे पाऊल उचलले आहे. सवाई मानसिंग स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. येथे खेळलेल्या परदेशी खेळाडूंचे फोटो या स्टेडियममध्ये लावण्यात आले होते.  त्यातील २५ पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो आता काढण्याचा निर्णय घेण्यात आलो आहे.

पाकिस्तानी संघाने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर एकूण ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे एकूण २५ फोटो लावण्यात आले होते. या भिंतीला ‘वैभवाची भिंत’ म्हणून ओळखले जाते. पण आता  राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयावरून असे दिसून येते की आता क्रिकेटमध्येही भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून भारतात अधूनमधून दहशतवादी हल्ले करण्यात येतात. याआधी २०१९ मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आता  पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटोही काढून टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा : अभिषेक शर्मा – दिग्वेष राठी मैदानात भिडले! खेळाडूंमध्ये बाचाबाची, सोशल मीडियावर Video Viral

एक गोष्ट  लक्षात ठेवण्यासारखी आहे की, भारत-पाकिस्तान  यांच्यात वाढत्या तणावानंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. त्यानंतर १७ मे पासून लीग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. पण लीग एका आठवड्यासाठी पुढे ढकलल्यानंतर आता अंतिम सामना हा ३ जून रोजी खेळवण्यात येणार येहे.

Web Title: India pakistan war indian stadium takes big decision regarding 25 pakistani players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • india pakistan war
  • PCB

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.