15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत आहेत. आता संघाला आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे.
आयसीसीने नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत बैठक घेतली. त्यानंतर, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसमोर एका मागून एक मागण्या पुढे करत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मंडळी आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरून अजूनही वादंग सुरू आहेत, दरम्यान पाकिस्तानने केलेल्य मागण्यांना आयसीसीने कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली आहे परंतु त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. भारत-पाकिस्तान सामना होणर की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बीसीबी आपल्या महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत अडचणीत सापडला आहे. महिला क्रिकेटपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेश उच्च न्यायालयाने बीसीबीला कडक शब्दांत फटकारले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहेत, आयसीसीचे माजी अधिकारी समी उल हसन बर्नी यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानने न येण्याची घोषणा केल्यानंतर, आयसीसीने स्पष्टीकरण मागितले. असे दिसते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नाही. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत ते शांतपणे खेळत आहे.
माजी क्रिकेटपटूही पाकिस्तानवर टीका करत आहेत आणि त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पीसीबीने भारताविरुद्ध पराभवाच्या भीतीने हा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून, पीसीबीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. जर PCB आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर आयसीसी मोठी कारवाई करू शकते. पीसीबीला कोट्यवधी रुपयांचा दंडही सहन करावा लागू शकतो.
पाकिस्तानच्या निर्णयानंतर, आयसीसीने रविवारी एक निवेदन जारी केले की, टी-२० विश्वचषकात निवडकपणे सहभागी होण्याचे निर्देश देणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या विधानाची आम्ही दखल घेतली आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा वादात सापडली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देत असून आयसीसीने त्यासाठी एक प्लान तयार करत आहे.
पाकिस्तान भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचारही करत आहे. सोमवारी पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची पुष्टी नक्वी यांनी सोशल मीडियावर केली.
बांगलादेश टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्याने आणि त्याजागी स्कॉटलंडला स्थान मिळाल्याने वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. स्कॉटलंडने इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळसह गट क मध्ये बांगलादेशची जागा घेतली.
नक्वी यांनी बांगलादेशला वगळण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर टीका केली होती आणि त्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. पाकिस्तानने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली तर आयसीसी अशी पावले उचलण्यास तयार आहे.
बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.
पाकिस्तानच्या एका माजी प्रशिक्षकाने हे निदर्शनास आणून दिले आहे, ज्यामुळे पीसीबीचे खरे स्वरूप उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियन या महान गोलंदाजाने २०२४ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पाकिस्तान क्रिकेट संघ…
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतग्रस्त झाला आहे. शाहीन शाह आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.