
ऑगस्टमध्ये भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा हिस्सा असणार भारत-श्रीलंका सिरिज
ऑगस्ट महिन्यात भारत अन् श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. लवकरच ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधीच भारताने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला होता. या कसोटी सामन्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये नव्हता. मात्र भारत अन् श्रीलंका टेस्ट सिरिजचा समावेश डब्लूटीसीमध्ये असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
15 ऑगस्टपासून भारत अन् श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआय लवकरच यासाठी संघाची घोषणा करू शकते. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन्ही सामने खेळून पूर्ण होणार आहेत. हे सामने कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत. मालिका सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच संघाची घोषणार होण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. मात्र जासपरीत बूमराह या सिरिजमध्ये खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन वनडेमध्ये बूमराह खेळला होता. मात्र शेवटच्या सामन्यात तो खेळला नव्हता. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. शुभमन गिल कर्णधार असणार आहे. तसेच या सिरिजसाठी संघाची घोषणा झाल्यावरच बूमराह कसोटी मालिका खेळणार आहे की नाही ही गोष्ट स्पष्ट होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने देखील महत्वाची असल्याने बूमराह या मालिकेत खेळण्याची शक्यता जास्त आहे. मात्र हे आता संघाची घोषणा झाल्यावरच समजणार आहे.