
ठाणे,दि.१२ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय अल्ट्रा धावपटू कार्तिक जोशी यांनी कारगिल ते कन्याकुमारी (के-टू-के) या ४,२०० किलोमीटरच्या ऐतिहासिक धाव मोहिमेला स्केचर्सचे बळ मिळाले आहे. ठाण्यात पोहचलेल्या कार्तिकने ५५ दिवसांत ही मोहीम पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
कारगिल वॉर मेमोरियल येथून २ मे रोजी सुरू झालेल्या या प्रवासात कार्तिक यांनी झोजिला खिंड, डोंगराळ रस्ते, खडतर भूभाग, महामार्ग आणि शहरांमधील मार्ग पार केले आहेत. दररोज सरासरी ७० ते ८० किलोमीटर धावत त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला असून मुंबई आणि ठाणे येथे स्थानिक धावपटूंसोबत विशेष रनिंग उपक्रमात सहभाग घेतला.
मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश
या मोहिमेदरम्यान कार्तिक स्केचर्सच्या ‘एअरो बर्स्ट’ आणि ‘एअरो स्पार्क’सह विविध रनिंग शूजचा वापर करत आहेत. स्केचर्स साऊथ एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वीरा यांनी कार्तिक यांच्या जिद्द, सातत्य आणि उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करत त्यांच्या विक्रम मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
कार्तिक यांनीही या प्रवासाला शारीरिक आणि मानसिक क्षमतेची मोठी परीक्षा असल्याचे सांगत, मार्गभर मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले. इंदूरचे रहिवासी असलेले कार्तिक जोशी भारतातील उदयोन्मुख धावपटूंमध्ये गणले जातात. मुंबई, बंगळुरू आदी शहरांमधून पुढे सरकणारी ही मोहीम कन्याकुमारी येथे विक्रम नोंदवण्याच्या प्रयत्नासह पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.