
मुंबई इंडियन्सच्या उतरत्या काळाला जबाबदार कोण? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याच कारणामुळे, ड्रेसिंग रूममधील माहिती सतत बाहेर फुटत असल्यामुळे फ्रँचायझीमधील प्रमुख अधिकारी अत्यंत निराश आहेत. गेल्या काही हंगामांमध्ये ज्या प्रकारे घटना घडल्या आहेत आणि ड्रेसिंग रूमच्या गोपनीयतेशी सातत्याने तडजोड केली गेली आहे, त्यामुळे क्रिकेट जगतातील जाणकारही चकित झाले आहेत, जे संघासाठी निश्चितच चांगले नाही.
संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ
काय म्हणाले अधिकारी?
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “जवळजवळ प्रत्येक ड्रेसिंग रूममध्ये मतभेद असतात, पण हार्दिक पांड्या परतल्यापासून मुंबई इंडियन्समध्ये गटबाजी आणि कटुता असामान्यपणे वाढली आहे. काय चालले आहे हे समजण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही, पण मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी, जिने नेहमीच आपल्या मुख्य खेळाडूंना प्राधान्य दिले आहे, ही सतत ड्रेसिंग रुममधील माहिती फुटणं ही एक मोठी चिंतेची बाब आहे. हा शब्द बोलायला कठोर आहे, पण हेच वास्तव आहे. त्या ड्रेसिंग रूमने दिग्गज खेळाडू, कर्णधारपदातील बदल आणि बरेच काही पाहिले आहे, पण असे काहीही कधीही घडले नाही, जे यावर्षी घडले आहे”
व्यवस्थापन नाराज
सूत्राने पुढे सांगितले, “व्यवस्थापनाला हे अजिबात आवडलेले नाही. काही खेळाडूंनी सोशल मीडियावर इमोजी पोस्ट केल्यानंतर बराच गदारोळ झाला होता आणि तेव्हापासून हा गदारोळ थांबलेला नाही. मग ती ड्रेसिंग रूममधील उघड गटबाजी असो, मैदानावर खेळाडूंची देहबोली असो किंवा त्यांची खेळण्याची शैली असो. समस्या आहेत आणि त्या जगासमोर स्पष्ट आहेत. जर खेळाडूंना वाटत असेल की ते मुंबई इंडियन्सला हलक्यात घेऊ शकतात, तर त्यांनी पुनर्विचार करण्याची गरज आहे. प्राधान्यक्रम स्पष्टपणे चुकले आहेत. खेळाडूंना मैदानावर परतायला खूप वेळ लागत आहे आणि असे वाटते की प्रत्येकजण फक्त हजेरी लावण्यासाठीच येत आहे. कोणीही चांगला खेळ केला नाही”
दरम्यान यावर्षीदेखील हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मैदानात खेळण्यापेक्षा त्याच्या खासगी आयुष्याबाबतच जास्त चर्चा झाली आणि याचाच परिणाम मुंबई इंडियन्सच्या संघावरही झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. इतंकच नाही तर किरॉन पोलार्डने स्पष्टपणे हार्दिकला भरपूर संधी देण्यात आल्याचे विधानही केले होते. दरम्यान ऋषभ पंतने LSG चा राजीनामा दिला त्याप्रमाणे हार्दिकदेखील मुंबई इंडियन्स संघ सोडणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ