Pak expert Qamar Cheema said Indian Army is against IND vs PAK match
पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांचा दावा भारतीय सैन्यालाही भारत-पाक सामना नको आहे.
सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांचा संताप उफाळला.
राजकीय वातावरण तापले विरोधी पक्ष, बळींची कुटुंबे आणि नेते सामन्याविरोधात; सरकार आंतरराष्ट्रीय नियमांचे कारण देत आहे.
IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी मानला जातो. पण यंदा या सामन्याभोवती तणाव, संताप आणि राजकीय तापमान वाढलेले दिसत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात भावनांची लाट उसळली असून, सोशल मीडियावर #BoycottINDvPAK हा ट्रेंड जोर धरताना दिसतो आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक व तज्ज्ञ कमर चीमा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले “भारतीय सैन्यालाही भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा असे वाटत नाही. ते म्हणतात, युद्धभूमीवर जेव्हा आपले जवान रक्त सांडत आहेत, तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर हातमिळवणी कशी करता येईल?”
कमर चीमा पुढे म्हणतात की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हा दबाव केवळ राजकीय नाही तर जनमानसातील असंतोषाचाही आहे. सोशल मीडियावर सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी, पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आणि विरोधी पक्षांचा आवाज या सर्वामुळे सरकारवर मोठे दडपण आले आहे. मात्र, बीसीसीआयचे म्हणणे काहीसे वेगळे आहे. त्यांच्यानुसार हा सामना एका बहुपक्षीय स्पर्धेचा भाग असल्याने भारताला खेळणे बंधनकारक आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे उल्लंघन होईल. पण या स्पष्टीकरणाला जनतेने फारसे गांभीर्याने घेतले नाही.
Merely three months back India fought and won a major battle against the terrorist country Pakistan in response to a major terrorist attack by Pakistan in Pahalgam.
While I am writing this a flood relief column is out from almost every garrison of our army, that’s their duty… pic.twitter.com/xIRxNAirC8
— Major Pawan Kumar, Shaurya Chakra (Retd) 🇮🇳 (@major_pawan) August 27, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osama Bin Laden : पाकिस्तानने ओसामा बिन लादेनच्या पत्नींसोबत काय केले? झरदारींच्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. सामान्यत: भारतीय चाहत्यांची नजर सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर खिळलेली असते. परंतु यावेळी वातावरण वेगळे आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते खुलेपणाने म्हणत आहेत “आमच्या शहीदांचा अपमान करून आम्ही पाकिस्तानशी सामना खेळताना पाहू इच्छित नाही.” त्यामुळे हा सामना केवळ खेळापुरता न राहता तो देशभक्ती, राजकारण आणि जनभावना यांच्या मोठ्या वादळात अडकला आहे.
या मुद्द्यावर राजकारण देखील चांगलेच तापले आहे. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे या सामन्याचा विरोध केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात या सामन्याचा निषेध करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे म्हणाले “आपले जवान सीमारेषेवर रोज प्राण देत आहेत, अशा वेळी आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले पाहिजे का?” विरोधी पक्षांचाही सूर साधारण हाच आहे. शहीदांच्या कुटुंबीयांच्या भावना आदराने मान्य केल्या पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?
सरकारच्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, भारताला हा सामना रद्द करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने करारबद्ध अटींमुळे संघाने मैदानात उतरावेच लागणार आहे. तरीही विरोधक आणि नागरिक या भूमिकेवर समाधानी नाहीत. भारत-पाक सामना हा नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी भावनिक असतो. पण यंदा हा सामना केवळ क्रीडा नाही, तर राष्ट्रीय भावना, राजकीय वाद आणि शहीदांच्या बलिदानाशी जोडला गेला आहे. खरं तर, खेळ आणि राजकारण वेगळे ठेवावे असे वारंवार सांगितले जाते. मात्र जेव्हा हल्ल्यांचे जखमे अजून ताज्या असतात, तेव्हा लोकांची भावनिक प्रतिक्रिया अटळ असते. आता १४ सप्टेंबरला मैदानावर सामना होईलच, पण त्याबरोबरच देशभरात सुरू असलेला विरोधाचा सामना सरकारला अधिक कठीण ठरणार आहे.