
भुवनेश्वर कुमार सध्या आरसीबीचा प्रमुख वेगवान गोलंदाज
लखनौविरुद्ध भुवनेश्वर कुमारने रचला विक्रम
भुवनेश्वर आयपीएलचा 200 सामना खेळला
Bhuvneshwar Kumar in IPL 2026: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलचे 50 सामने पूर्ण झाले आहेत. काल 50 वा सामना म्हणून लखनौ आणि आरसीबीमध्ये सामना झाला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. मात्र सध्या भुवनेश्वर कुमारने कालच्या सामन्यात आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तो रेकॉर्ड नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे. भुवनेश्वर कुमार लखनौ विरुद्ध आपला 200 वा सामना खेळला आहे. भुवीने आयपीएल इतिहासात 200 सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 12 खेळाडूंनी 200 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे, मात्र वेगवान गोलंदाजांमध्ये हा पराक्रम करणारा भुवनेश्वर पहिलाच ठरला आहे.
खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
“आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. कोणताही नवा विक्रम करणे हा कायम आनंददायी गोष्ट असते. त्यातही वेगवान गोलंदाज म्हणून 200 सामने खेळणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे”, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला. यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमार आरसीबीकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 17 विकेट्स पटकावल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट्स आणि 200 सामने खेळणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज ठरला आहे.
बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
खेळाडूंच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंना टार्गेट करण्यासाठी आखले जाणारे ‘हनीट्रॅप’चे जाळे आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन बीसीसीआयने मोठी पावले उचलली आहेत. आता खेळाडूंच्या हॉटेल रूममध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट
बीसीसीआय बोर्डाने थेट बाहेरील व्यक्तींसाठी बंदी जाहीर केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय जारी केला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अँटी करप्शन प्रोटोकॉल’चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या आयपीएल हंगामात काही ‘अनधिकृत’ व्यक्ती खेळाडूंसोबत प्रवास करत असल्याचे, हॉटेल आणि टीम बसमध्ये थेट प्रवेश मिळवत असल्याचे आणि थेट खेळाडूंच्या खोल्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, त्यावर आता बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.