Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Sports News: 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2025 | 02:52 PM
SC On IND Vs Pak: "इतकी घाई काय आहे? हा तर..."; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SC On IND Vs Pak: "इतकी घाई काय आहे? हा तर..."; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना 
आशिया कप स्पर्धेत रंगणार सामना 
पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच येणार आमने-सामने 

Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धा सुरू झाली आहे. कालच भारताने संयुक्त अरब अमिरातीवर जोरदार विजय प्राप्त केला आहे. दरम्यान 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर महत्वाचा निर्णय दिला आहे.

आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रद्द व्हावा अशी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय भावनेच्या विरोधात असल्याचे या जनहित याचिकेत म्हणण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सैनिकांनी दिलेल्या बलीदानानंतर पाकिस्ताविरुद्ध सामना खेळणे शहीदांच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. नागरिकांची सुरक्षा, राष्ट्रहीत, हेच आपले प्रथम प्राधान्य असले पाहिजे असे या जनहित याचिकेत सांगण्यात आले होते. हा सामना रविवारी असल्याने याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी खटला सुनावणीसाठी घ्यावा, अशी विनंती केली.

याचिकाकर्त्यांनी केलेल्या विनंतीला सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नकार दिला. “भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रोखण्याचा आमचा कसलाही विचार नाही. हा तर सामना आहे. इतकी घाई कसली आहे? असे म्हणत सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता 14 तारखेला दुबईत भारत पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाणार आहे.

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

भारताची दमदार सुरुवात 

हे उल्लेखनीय आहे की बुधवारी भारताने आशिया कप २०२५ मध्ये दमदार सुरुवात केली. युएईचा ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना युएईने ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने चार विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २७ चेंडूत १ विकेट गमावून ६० धावा करून सामना जिंकला.

IND vs UAE : कुलदीप यादवने घेतली UAE ची फिरकी; दिग्गज आर अश्विनला टाकले ‘या’ विक्रमात मागे..

दिग्गज आर अश्विनला टाकले मागे सोडले

२०२४ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर कुलदीप यादवचा आशिया कप २०२५ मध्ये यूएई विरुद्ध हा पहिलाच टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून होत्या आणि त्याने देखील कुणाला निराश केले नाही. त्याने एकाच षटकात त्याने तीन विकेट्स काढल्या. या दरम्यान, त्याने त्याच्या स्पेलमध्ये एकूण फक्त ७ धावा मोजल्या. या शानदार कामगिरीनंतर, कुलदीप आता भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला देखील मागे टाकत परदेशात भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेणारा  गोलंदाज बनला आहे.

 

Web Title: Sureme court refuses india pakistan match cancel petition in asia cup 2025 sprots marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात
1

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
2

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

Asia Cup 2025 : आशिया कपच्या काॅमेंट्री पॅनलमध्ये कोणत्या पाकिस्तानी खेळाडूंना मिळाले स्थान? या भारतीय दिग्गजांसह करणार काॅमेंट्री
3

Asia Cup 2025 : आशिया कपच्या काॅमेंट्री पॅनलमध्ये कोणत्या पाकिस्तानी खेळाडूंना मिळाले स्थान? या भारतीय दिग्गजांसह करणार काॅमेंट्री

Rain Update: पंजाब, उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत होऊन राज्यांना नोटीस
4

Rain Update: पंजाब, उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत होऊन राज्यांना नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.