
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Suryakumar Yadav’s Criticism After 2026 T20 World Cup : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने शानदार कामगिरी केली आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली. भारताच्या संघाने मागील दोन वर्षामध्ये सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या विश्वचषकानंतर एकही टी20 मालिका न गमावता संघाने विश्वचषकामध्ये प्रवेश केला होता. भारताच्या संघाने विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या फेरीमध्ये एक सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गमावला होता.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताच्या संघाने सामना गमावल्यानंतर सर्वानाच मोठा धक्का बसला होता पण त्यानंतर संजू सॅमसंन याने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विश्वचषक सुर्याकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला. भारतीय संघ घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघही ठरला. शिवाय, भारत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. तथापि, यानंतरही रिकी पॉन्टिंगने सूर्यावर टीका केली.
सूर्यकुमार यादवच्या वैयक्तिक फलंदाजीवर रिकी पॉन्टिंग नाराज आहे. सूर्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “खेळाडू म्हणून त्याच्याकडे सर्वोत्तम काळ नव्हता, पण तरीही तो शेवटी विश्वचषक ट्रॉफी आपल्या हातात ठेवतो. एक माजी कर्णधार म्हणून, मला माहित आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वोत्तम स्थितीत नसता तेव्हा कर्णधारपद खरोखर कठीण असू शकते. आणि जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करत असता तेव्हा कर्णधारपद खरोखर सोपे असू शकते. गेल्या काही आठवड्यात सूर्याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनशी कसा संवाद साधला आहे हे पाहणे खरोखर मनोरंजक ठरले असते. तिथून खरी नेतृत्वाची कहाणी समोर येईल.” पॉन्टिंगने सूर्याच्या फलंदाजीवर सूक्ष्मपणे टीका केली, परंतु त्याच्या कर्णधारपदाचे कौतुक केले.
अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्याने ८४ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय, त्याने आठ डावांमध्ये एकूण १५८ धावा केल्या. तथापि, सूर्याने संपूर्ण स्पर्धेत भारताचे शानदार नेतृत्व केले. भारताने लीग टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. तथापि, सुपर ८ मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. शिवाय, भारत स्पर्धेत अपराजित राहिला आणि ट्रॉफी जिंकली.