
प्ले ऑफच्या प्रवेशासाठी चुरस वाढली
पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव
मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे समीकरण बिघडले
IPL 2026 Play Off Equation: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 27 मार्च रोजी सुरू झालेली स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल आयपीएलच्या स्पर्धेतील महत्वाचा सामना पार पडला. पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईकहा विजय झाला. त्यामुळे प्ले ऑफचे समीकरण आता बदलले आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे. कालच्या सामन्यात पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव झाला आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. मात्र आता त्यांच्या परभवामुळे त्यांचे प्ले ऑफचे गणित बिघडले आहे.
पंजाबच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीला अजिंक्य राहण्याचा विक्रम केला होता. सर्वच सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता. मात्र त्यानंतर त्यांची चांगलीच घसरण झाली आहे. सध्या पॉईंट्स टेबलचे चित्र आहे, तसेच आहे. मात्र आता पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबच्या खात्यात आता 13 पॉईंट्स जमा झाले आहेत. आता पंजाबचे केवळ 2 सामने बाकी आहेत. पंजाब आपले पुढील दोन सामने लखनौ आणि आरसीबीविरुद्ध खेळणार आहे. प्ले ऑफमध्ये जायचे असल्यास पंजाबला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
IPL 2026 चा थरार! वर्माचा विजयी ‘तिलक’; पलटणकडून PBKS चा पंचनामा, किंग्जचे टेंशन वाढले
पलटणकडून PBKS चा पंचनामा
धरमशाळा येथील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. हा सामना पंजाब किंग्जसाठी महत्वाचा होता. पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 201 रन्सचे टार्गेट दिले होते. तिलक वर्माने शानदार खेळी केली. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
पंजाबने दिलेल्या 201 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टनने आणि रोहित शर्माने सुरुवात केली. या दोघा सलामीवीरांनी मुंबईला अत्यंत मजबूत अशी सुरुवात करून दिली. मात्र रियान रिकल्टनने 48 रन्सची शानदार खेळी केली. नमन धीरने 8 रन्सची लहानशी खेळी केली. रोहित शर्माने 25 रन्सची खेळी केली. मुंबई इंडियन्सचा विजय अवघड झाला असताना तिलक वर्माने डाव सांभाळला. त्याने संयमी खेळी करत अर्धशतक लगावले. तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 75 रन्सची खेळी केली.