
प्ले ऑफच्या मॅचेससाठी काय आहेत नियम
क्वालिफायर आणि फायनलसाठी वेगळे समीकरण
24 मे रोजी शेवटचे दोन लीग सामने खेळवले जाणार
IPL 2026 Playoff Rules: यंदाचा आयपीएलचा महासंग्राम शेवटच्या टप्प्यात आला आहे. आयपीएल 2026 च्या लीगमध्ये प्ले ऑफची चुरस वाढली आहे. सर्व संघ क्वालिफाय होण्यासाठी धडपडत आहेत. मात्र या महत्वाच्या चार सामन्यांत पावसाने खोडा घातल्यास विजेता कसा ठरवला जातो. बीसीसीआयचे नियम काय सांगतात? 24 मे रोजी शेवटचे दोन लीग सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयचे नियम काय सांगतात ते जाणून घेऊयात.
26 मे पासून क्वालिफायर आणि एलिमेनेटर व फायनल सामने होणार आहेत. या चार सामन्यांमध्ये पाऊस झाला तर कोणते नियम लागू होतात. आयपीएलच्या केवळ फायनल सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवण्यात येतो. क्वालिफायर 1 , एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यांसाठी कोणताही दिवस राखीव नसतो. मात्र यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो.
समजा क्वालिफाय आणि एलिमेनेटर सामन्यांसाठी पाऊस झाल्यास सामना रद्द न करता तो पूर्ण करण्यासाठी कट-ऑफ टाईमपर्यंत वाट पाहिली जाते. सामन्याच्या मूळ वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त 120 मिनिटे दिली जातात. पाऊस थांबल्यास सर्वात आधी प्रत्येकी 5 ओव्हर्सची मॅच खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी रात्री 11.50 ते 12.00 च्या आसपास सामना सुरू होणे आवश्यक असते.
घोळात घोळ! Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’; पलटणने बिघडवले Play OFF चे समीकरण
शेवटी पाऊस क्वालिफायर आणि एलिमेनेटर सामन्यांमध्ये थांबलाच नाही आणि 5 ओव्हर्सची मॅच किंवा सुपर ओव्हरही होऊ शकली नाही. त्यानंतर बीसीसीआय पॉईंट्स टेबलचा आधार घेते. ऑफचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर लीग स्टेजच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असणाऱ्या संघाला विजेते घोषित केले जाते. उदाहरणार्थ क्वालिफायर 1 मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ आमनेसामने आले. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास पहिल्या स्थानवरील संघ पुढे जाईल. एलिमिनेटर सामन्यात तिसऱ्या क्रमांकावरील संघ पुढे जाईल.
फायनलसाठीचा नियम काय?
बीसीसीआय आयपीएल लीगच्या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवते. ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जातो. रिझर्व्ह डेलाही पाऊस थांबला नाही तर, तर लीग स्टेजमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाला आयपीएलचा ‘चॅम्पियन’ घोषित केले जाते.
LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट
Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’
मुंबई इंडियन्सचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे. कालच्या सामन्यात पंजाब किंग्जला सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र पंजाब किंग्जचा सलग 5 वा पराभव झाला आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. मात्र आता त्यांच्या परभवामुळे त्यांचे प्ले ऑफचे गणित बिघडले आहे.