Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर फेकली टोपी! तुम्ही पहिला का हा Video

खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव पाहून विराट कोहलीला मैदानावर आपला राग आवरता आला नाही. रागाच्या भरात त्याने त्याची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 08, 2025 | 04:02 PM
फोटो सौजन्य - स्टार स्पोर्ट्स सोशल मीडिया

फोटो सौजन्य - स्टार स्पोर्ट्स सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर असतो तेव्हा तो चर्चेत येतो. कधी कोहली त्याच्या शानदार फलंदाजी, क्षेत्ररक्षणामुळे तर कधी त्याच्या रागामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतो. अलिकडेच, मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या २० व्या सामन्यात विराट कोहली रागावलेला दिसला. पहिल्यांदा तो बाद झाल्यानंतर त्याने त्याची बॅट ड्रेसिंग रूममध्ये फेकली. क्षेत्ररक्षण करताना, त्याच्या सहकारी खेळाडूने केलेली चूक पाहून कोहलीने त्याची टोपी जमिनीवर फेकली. कोहली इतका रागावला ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विराट कोहलीने रागाच्या भरात मैदानावर फेकली टोपी

खरंतर, विराट कोहली वानखेडे मैदानावर खूप रागावला. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या १२ व्या षटकात यश दयालच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने शॉट मारला. यशला सोपा झेल घेण्याची संधी होती पण नंतर यष्टीरक्षक जितेश शर्मा आला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली आणि चेंडू खाली पडला. चेंडू बराच उंच होता आणि यष्टीरक्षक जितेशला झेल घ्यायचा होता पण यशने त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्यामुळे आरसीबीला पराभव पत्करावा लागला. या दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव पाहून विराट कोहलीला मैदानावर आपला राग आवरता आला नाही. रागाच्या भरात त्याने त्याची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली.

KKR vs LSG : ईडन गार्डनवर रिषभ पंतची टोळी KKR ला करणार पराभूत? कोलकाताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

या घटनेचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाले आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी, क्रीजवर असलेला सूर्यकुमार २७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करत होता, परंतु जितेश आणि यश दयाल यांच्या चुकीमुळे त्याला जीवनरेखा मिळाली. तथापि, फिल सॉल्टने सूर्यकुमार यादवला बाद करून ही चूक सुधारली.

Virat Kohli’s angry reaction after Yash Dayal dropped the catch.😎#ViratKohli #RCBvsMI #HardikPandya pic.twitter.com/zrxBfqT4pp — Indian Cricket Fc (@Jonathan_fcc) April 8, 2025

प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने विराट कोहली (६७) आणि कर्णधार रजत पाटीदार (६४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सविरुद्ध २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, मुंबई संघानेही २०९ धावा केल्या आणि इतक्या जवळ येऊनही त्यांना विजय मिळवता आला नाही. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती, पण कृणाल पंड्याने तीन विकेट्स घेत मुंबईला सामन्यातून बाहेर काढले. या स्पर्धेत मुंबईचा हा सलग चौथा पराभव आहे.

Web Title: Virat kohli got angry over a player mistake threw his hat on the field in anger viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • cricket
  • MI vs RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.