Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WCL 2025 : जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सेमीफायनलमध्ये झाला तर? जाणून घ्या संघ मालकाचे उत्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे तो रद्द करावा लागला. पण जर नॉकआउटमध्ये दोन्ही संघांमधील सामन्याची परिस्थिती उद्भवली तर काय? 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 21, 2025 | 02:35 PM
फोटो सौजन्य – सोशल मिडीया

फोटो सौजन्य – सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) २०२५ मध्ये रविवारी होणारा इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्याबाबत भारतात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लोक पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यावर टीका करत होते. नंतर, भारतातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे तो रद्द करावा लागला. पण जर नॉकआउटमध्ये दोन्ही संघांमधील सामन्याची परिस्थिती उद्भवली तर काय? 

सेमीफायनल किंवा फायनलमध्ये अशी परिस्थिती उद्भवली तर काय? पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचे मालक कामिल खान यांनी म्हटले आहे की ही टी-२० स्पर्धा त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही. खानने दावा केला की जर रविवारी सामना रद्द झाला तर पाकिस्तानला २ गुण मिळतील कारण भारतीय संघाने सामन्यातून माघार घेतली आहे. तो म्हणाला की नियमांनुसार, त्याचा संघ २ गुणांना पात्र आहे.

IND VS ENG : मँचेस्टरमध्ये अंशुल कंबोजचा नंबर लागणार? आकडेवारी पाहून बसेल धक्का, गंभीर–गिल दुर्लक्ष करू शकत नाही…

WCL चा अंतिम सामना २ ऑगस्ट २०२५ रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत भारतीय चॅम्पियन्सचा पहिला सामना पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध होणार होता परंतु अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी माघार घेतल्याने हा सामना रद्द करण्यात आला. पाकिस्तान हॉकी संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याची बातमी आयोजकांनी आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील सामना राखून ठेवल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

तथापि, शिखर धवनचा दावा आहे की त्याने ११ मे रोजीच आयोजकांना कळवले होते की तो पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही. हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना, युवराज सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. या स्पर्धेचा पहिला हंगाम इंडिया चॅम्पियन्सने जिंकला होता. त्यानंतर त्यांनी अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवले.

श्रीशांतला कानशिलात मारल्यानंतर भज्जीने 200 वेळा मागितली माफी? तरीही होतोय पश्चाताप… हरभजनने केला मोठा खुलासा

या स्पर्धेमध्ये 18 सामने खेळवल्या जाणार आहेत आत्तापर्यंत या स्पर्धेचे चार सामने झाले आहेत यामध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता हा सामना पाकिस्तानच्या संघाने जिंकला होतात तर वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात साउथ आफ्रिकेच्या संघाने जिंकला होता. एक सामना रद्द करण्यात आला तर दुसरा सामना हा निर्णय राहिला. या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. सध्या चार सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ हा अव्वल स्थानावर आहे तर साऊथ आफ्रिकेचे संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ तर चौथा स्तनावर ऑस्ट्रेलियन संघ आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे वेस्टइंडीज आणि भारत आहेत.

Web Title: Wcl 2025 what if india vs pakistan match happens in the semi finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • cricket
  • Harbhajan Singh
  • IND VS PAK
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
1

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
2

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
3

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
4

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.