
photo- BCCI
मानव सुथारचा जन्म ३ ऑगस्ट २००२ रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. सुथार हा एक डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू असून तो डावखुरा फलंदाजही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने १७ फेब्रुवारी २०२१-२२ रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रविरुद्ध प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच, त्याने २०२२ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
गुजरातने २०२४ मध्ये मानव सुथारला संघात सामील केले. गुजरातने २०२५ च्या आयपीएल हंगामासाठी त्याला ३० लाख रुपयांना परत विकत घेऊन त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी त्याला आयपीएल २०२६ साठी त्याच्या मूळ किमतीत कायम ठेवले. मानव सुथार २०२४ ते २०२६ या तीन हंगामांमध्ये मिळून एकूण पाच आयपीएल सामने खेळला. त्या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. विशेष म्हणजे आयपीएलनंतर आता भारतीय संघातही त्याला गिलच्याच नेतृत्वाखाली पदार्पणाची संधी मिळाली आहे. जीटी संघ यावर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
The smile says it all ☺️🧢 Congratulations to debutant Manav Suthar as he receives his #TeamIndia Test cap from Kuldeep Yadav 🙌 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/YRa3nUnYIY — BCCI (@BCCI) June 6, 2026
मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जबरदस्त छाप पाडली आहे. मानवने २९ प्रथम-श्रेणी सामन्यांच्या ६२ डावांमध्ये १२९ विकेट्स घेतले आहेत. त्याने एका सामन्यात तीन वेळा १० विकेट्स, सहा वेळा ५ विकेट्स आणि आठ वेळा ४ विकेट्स घेतले आहेत. तसेच, त्याने राजस्थानकडून रणजी ट्रॉफीच्या एका डावात ८ विकेट्स घेतले असून, ही त्याची प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
मानव सुथारने एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये (ACC Emerging Teams Asia Cup) यूएई ‘अ’ संघाविरुद्ध लिस्ट ‘अ’ संघात पदार्पण केले. त्याने २५ लिस्ट ‘अ’ सामन्यांमध्ये ३४ विकेट्स घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/३२ आहे. तसेच, त्याने २९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतले आहेत.
प्रथम-श्रेणी: २९ सामने, १२९ विकेट्स
सर्वोत्तम कामगिरी ८/३३
लिस्ट-ए: २५ सामने, ३४ विकेट्स
देशांतर्गत टी२०: २९ सामने,२५ विकेट्स
आयपीएल: ५ सामने, २ विकेट्स
भारतीय संघ सध्या भविष्यासाठी नवे फिरकी पर्याय तयार करत आहे. अशा परिस्थितीत मानव सुथारसारख्या युवा अष्टपैलू खेळाडूला संधी मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे. तो केवळ गोलंदाज नाही, तर खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे संघाला संतुलन मिळण्यास मदत होणार आहे.