Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित – विराट ODI क्रिकेटला करणार अलविदा? 2027 च्या विश्वचषकापूर्वी होणार मोठा निर्णय

2023 मध्ये भारतामध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आता 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या 2027 च्या विश्वचषकआधी भारतीय निवडकर्ते मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 11, 2025 | 12:33 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली या मालिके आधी भारताचे दोन्ही स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांनीही फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार असे सांगितले होते. 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत पण हे जास्त वेळ भारतीय संघासाठी खेळणार नाहीत अशी अटकळ बांधली जात आहे. 

2023 मध्ये भारतामध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आता 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या 2027 च्या विश्वचषकआधी भारतीय निवडकर्ते मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत. पण आशिया कपपूर्वी भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कोहली आणि रोहितच्या एकदिवसीय भविष्याबद्दलच्या अटकळींवर बीसीसीआयने आता आपले मौन सोडले आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की बोर्ड त्यांच्या भविष्याबद्दल कोणताही निर्णय घेण्याची घाई करत नाही आणि सध्या त्यांचे लक्ष आगामी आशिया कप आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीवर आहे.

AUS VS SA : कांगारु संघाच्या खात्यात मालिकेचा पहिला विजय! दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी केलं पराभुत

इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतर, आशिया कप सुरू होईपर्यंत भारत कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणार नाही. या काळात, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल चर्चा तीव्र झाल्या आहेत. वृतांच्या माहितीनुसार असे सूचित केले होते की दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 2025) त्यांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीला निरोप देऊ शकतात.

🚨 NO DISCUSSIONS ON RO-KO. 🚨

– A BCCI source confirms there’s no discussion on Virat Kohli and Rohit Sharma’s ODI future. The BCCI is in no hurry to take a call on them. (PTI). pic.twitter.com/yFNKAjgV0D

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 10, 2025

तसेच, जर त्यांना २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळायचे असेल तर त्यांना देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घेण्यास सांगण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटशिवाय निवडीची शक्यता कमी मानली जाते. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अनुभवी सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, बीसीसीआयमध्ये ‘फेअरवेल मॅच’ची अशी कोणतीही घाई किंवा चर्चा झालेली नाही. तसेच कोणत्याही खेळाडूवर निवृत्तीसाठी दबाव आणला जात नाही. बोर्ड घाईघाईत संवेदनशील निर्णय घेत नाही आणि मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत जनतेच्या भावना आणि खेळाडूंच्या इच्छेला महत्त्व देते.

अनिमेश कुंजूरने स्वतःला झोकून गोल्ड मेडल केलं नावावर! मुरली श्रीशंकर – शैली सिंगची कौतुकास्पद कामगिरी

सूत्रानुसार, “कोहली आणि रोहित हे दोघेही खेळाडू आधीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत आणि सध्या ते फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय आहेत. जर त्यांच्या मनात काही योजना असतील तर ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्कीच सांगतील जसे त्यांनी इंग्लंड कसोटी दौऱ्यापूर्वी सांगितले होते. दुसरीकडे, जर आपण भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, पुढची मोठी स्पर्धा फेब्रुवारीमध्ये होणारा टी-२० विश्वचषक आहे आणि आपल्याला आता त्याची तयारी करावी लागेल, ज्यामध्ये आमचे लक्ष सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप टी-२० स्पर्धेवर आहे, ज्यामध्ये आम्ही एक चांगला संघ पाठवण्याचा प्रयत्न करू.”

Web Title: Will rohit sharma and virat kohli retire from odi cricket a big decision will be made before the 2027 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • bcci
  • Rohit Sharma
  • Team India
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
3

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला
4

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.