
India refuse to take trophy from mohsin naqvi
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यापूर्वी, २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. आता महिला संघानेही त्याच पाऊलावर पाऊल ठेवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १८३ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. मंधानाने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावांची शानदार खेळी केली, तर शफालीने ३९ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही १४ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या आणि रिचा घोषने १३ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात स्लो झाली. सलामीवीर चमारी अथापथ्थूने ३२ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या, तर इमेशा दुलानीने ४ चेंडूंमध्ये ४ धावा केल्या. विष्मी गुणरत्नेनेही २२ चेंडूंमध्ये २० धावा केल्या आणि नीलाक्षिका सिल्वाने १६ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ २० षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना ७२ धावांनी जिंकला. श्री चरणीने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. तिने चार षटकांत २० धावांत चार फलंदाजांना बाद केले. दीप्ती शर्मानेही चार षटकांत १९ धावांत तीन विकेट्स घेतले. प्रेमा रावत आणि क्रांती गौड यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला. भारताने ८ व्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत इतिहास रचला.