
NASA चा धक्कादायक अंदाज! सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन येणार संपुष्टात? जाणून घ्या काय म्हणाले शास्त्रज्ञ
Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत
शास्त्रज्ञांना पूर्वी वाटत होते की हे २ अब्ज वर्षांनतर घडेल, परंतु नासाच्या सुपरकॉम्प्युटरने गणना केली आहे की हा बदल नेमका १,००,००,०२,०२१ च्या सुमारास होईल, सूर्य दररोज अधिक तेजस्वी आणि उष्ण होत आहे. पुढील १ अब्ज वर्षात, तो इतका उष्ण होईल की पृथ्वीचे वातावरण बदलेल. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पाणी महासागरांमधून वरील हवेत जाईल, यामुळे ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया थांबेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
शास्त्रज्ञांच्या मते, घाबरण्याची गरज नाही. १ अब्ज वर्षे हा खूप मोठा काळ आहे. जर मानवाने हवामान बदलासारख्या स्वतः निर्माण केलेल्या संकटांना आजच तोड दिले, तर भावी पिढ्या या आव्हानासाठी तयार होऊ शकतात, ते ऑक्सिजन तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात किंवा पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर स्थायिक होऊ शकतात. सध्या, आपले लक्ष ‘डूम्सडे क्लॉक’ (प्रलय घड्याळ) सारख्या मानवनिर्मित आपत्तीवर आहे.
Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत
सुमारे २५ अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीवर ऑक्सिजन खूप कमी होता. मग एका नवीन प्रकारच्या जीवाने ऑक्सिजन तयार करण्यास सुरुवात केली. याला ‘ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट (महाऑक्सिडीकरण घटना) म्हणतात. यामुळे पूर्वीचे सर्व जीव नष्ट झाले आणि एक नवीन ऑक्सिजन-समृद्ध वातावरण तयार झाले. आज आपण त्याच ऑक्सिजनवर जगतो. शास्त्रज्ञ औजाकी आणि रेनहार्ड म्हणतात की हा ऑक्सिजन कायम टिकणार नाही. सूर्याची वाढती उष्णता जुने दिवस परत आणेल. संगणकीय मॉडेलनुसार, १ अब्ज वर्षांनंतर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी असेल.