गडचिरोलीच्या दुर्गम बिनागुंडा गावात अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीचा अभाव असतानाही आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांनी १८ किलोमीटर स्टेचरवरून पायी नेत वेळेत उपचार मिळवून दिले.
गेल्या 24 तासात सरासरी 30.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधारा कोसळत असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे.