राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथे दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात १५ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून त्यावर आणखी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथे दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात १५ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून त्यावर आणखी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.






