खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जमाफी करु असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.