
Imtiaz Jaleel
छत्रपती संभाजीनगरात मतीन पटेल प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार, महापालिका प्रशासन आणि माध्यमांवर जोरदार टीका केली आहे. या राज्यात गुंडाराज सुरू आहे”, असा गंभीर आरोप करत जलील यांनी मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “एका व्यक्तीवर केवळ आरोप झाले असताना त्याचं घर पाडण्याची इतकी घाई का झाली? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जलील म्हणाले, “काल सुनावणीदरम्यान मतीन पटेल यांच्या वकिलांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती, मात्र महापालिकेच्या वकिलांनी ती मान्य केली नाही.” यावेळी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत “माध्यमांचाही रोल निंदनीय आहे” अशी टीका केली. दरम्यान, “निदा खान माझी नातेवाईक आहे” असा दावा मंत्री संजय सिरसाठ यांनी केल्याचा उल्लेख करत जलील यांनी त्यांना थेट इशारा दिला. “पुराव्यासह सिद्ध करा, अन्यथा कोर्टात खेचणार,” असं जलील म्हणाले.