मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या नोंदी व जात प्रमाणपत्रे रद्द करण्या संदर्भात कथित पत्रव्यवहार झाल्याचा दावा करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट सवाल उपस्थित केले. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही कागदपत्रे कॅमेऱ्यासमोर दाखवत सरकारला जाब विचारला. मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांची वैधता रद्द केल्याने केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजाचेच नुकसान होत नसून, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील मराठा समाजातील कुटुंबांवर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र अवैध का ठरवण्यात आले? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील मुला-बाळांच्या भविष्यासाठी आपण लढत असल्याचे सांगत, सरकारने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असेही ते म्हणाले.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या नोंदी व जात प्रमाणपत्रे रद्द करण्या संदर्भात कथित पत्रव्यवहार झाल्याचा दावा करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट सवाल उपस्थित केले. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही कागदपत्रे कॅमेऱ्यासमोर दाखवत सरकारला जाब विचारला. मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांची वैधता रद्द केल्याने केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजाचेच नुकसान होत नसून, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील मराठा समाजातील कुटुंबांवर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र अवैध का ठरवण्यात आले? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजातील मुला-बाळांच्या भविष्यासाठी आपण लढत असल्याचे सांगत, सरकारने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असेही ते म्हणाले.