रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे. रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे. रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.