
Indian Youth Questions to Iranian Embassy Mumbai for job Reply Viral
US Iran Ceasefire वरून गोंधळ! पाकिस्तानच्या मध्यस्थीवर UAE संतापला ; ‘फसवणुकीचा’ गंभीर आरोप
काय आहे नेमकं प्रकरण?
अक्षय आनंद नावाच्या भारतीय तरुणाने मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाला टॅग करत नोकरीसाठी थेट प्रश्न विचारला आहे. त्याने विचारले आहे की, तुमच्या सोशल मीडिया टीमसाठी भारतीयांची नियुक्ती करता का? त्याच्या या प्रश्नाना मोठी खळबळ उडवून दिली आहे. सहसा सरकारी संस्था किंवा दूतावास अशा वैयक्तिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. परंतु इराणी दूतावासाने याला उत्तर दिले आहे.
दूतावासाने म्हटले आहे की, आम्हाला खरोखरच आवडेल, परंतु सध्या आमच्याकडे कोणतीही जागा रिक्त नाही. सध्या आमच्या टीममध्ये सगळे इराणी लोक आहे. पण भविष्यात आमच्या भारतीय मित्रांना टीममध्ये सामील करुन घेण्यास आवडेल. दूतावासाच्या या उत्तराने अनेक भारतीयांची मने जिंकली आहे.
Hi, We’d genuinely love to, but at the moment there are no vacancies. Our current team is all Iranian (with a soft spot for #India), though bringing our Indian friends onboard someday is a pretty great idea.#Iran https://t.co/UgBEuMaQal — Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 8, 2026
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इराणी दूतावासाच्या या उत्तरावर भारतीयांना कौतुकांचा वर्षावर केला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी आम्हालाही वेटिंग लिस्टमध्ये टाका असे मजेशीर अंदाजात म्बटले आहे. काही नेटकऱ्यांनी त्याला येणाऱ्या भाषा सांगू भविष्यात इराणच्या दूतावासात काम करायला नक्कीच आवडेल असे म्हटले आहे, तर अनेकांच्या मते हे दोन्ही देशांतील चांगल्या संबंधाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे असे म्हटले आहे.