Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासोबत ‘असे’ करणार… युनूस सरकारमधील हिंसाचारावर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे मोठे वक्तव्य

बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. स्थिरता आणि विकासाला चालना देणारी राष्ट्रीय सहमतीची गरज त्यांनी अधोरेखित केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 02, 2025 | 11:28 AM
Bangladesh Army Chief's big statement on violence in Yunus government This will be done with India

Bangladesh Army Chief's big statement on violence in Yunus government This will be done with India

Follow Us
Close
Follow Us:

ढाका : बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. स्थिरता आणि विकासाला चालना देणारी राष्ट्रीय सहमतीची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रथमोला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सद्यस्थिती आणि शेजारी देशांशी असलेले संबंध यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी मोहम्मद युनूसच्या अंतरिम प्रशासनातील पोलिसांच्या अपयशावर चिंता व्यक्त केली आणि देशातील शांतता, सुशासन आणि विकासासाठी राजकीय पक्षांच्या सक्रिय भूमिकेवर भर दिला.

जनरल वकार म्हणाले की, बांगलादेशची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासासाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. ते म्हणाले, “शांतता आणि स्थैर्याशिवाय विकास आणि सुशासन शक्य नाही. आपल्याला परस्पर सहिष्णुता वाढवावी लागेल आणि सलोख्याच्या दिशेने पावले टाकून राष्ट्रीय सहमतीचे वातावरण निर्माण करावे लागेल.” भारतासोबतच्या संबंधांवर वक्तव्य करताना ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्यातील परस्परावलंबन महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की भारत आणि बांगलादेश या दोघांनाही त्यांच्या सुरक्षा, आर्थिक क्रियाकलाप आणि इतर गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल. संबंध चांगले राहणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.

ते म्हणाले की, आम्ही आमच्या कोणत्याही शेजारी देशासोबत त्यांच्या सामरिक हिताच्या विरोधात असे काहीही करणार नाही.

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी

बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यांनी भारताला रिमांडर पाठवले होते. आता पुन्हा एकदा बांगलादेशाने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन भारताबाबत आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी शेख हसीनांच्या प्रत्यर्पण आणि भारत, अमेरिका, तसेच चीनसोबत मजबूत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणे हे अंतरिम सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेने चुकूनही भारताविरोधात उचलले ‘हे’ पाऊल तर होईल मोठे नुकसान; ‘ट्रेड, टॅरिफ आणि ट्रम्प’ (RIS) चा इशारा

लष्कराची भूमिका मर्यादित करण्याबाबत चर्चा

देशातील निष्क्रिय पोलिस प्रशासनादरम्यान लष्कराची भूमिका वाढण्याची शक्यता जनरल वकार यांनी फेटाळून लावली. त्यांनी बांगलादेशातील मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि संस्था पुनर्संचयित करण्यासाठी राजकीयदृष्ट्या सक्षम सरकारच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, आम्हाला राजकीय पक्ष आणि सरकार हवे आहे. राजकारण आणि राजकीय सरकारशिवाय देशात संस्थात्मक पुनर्स्थापना शक्य नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस म्हणजे कल्पनांच्या आकाशात भविष्याचा शोध

म्यानमार सीमेवरील सुरक्षा चिंतेचा उल्लेख

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धावर बोलताना जनरल वकार यांनी कबूल केले की बांगलादेश-म्यानमार सीमेवर सुरक्षेची चिंता आहे. शेजारी देशांशी संतुलित आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Bangladesh army chiefs big statement on violence in yunus government this will be done with india nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Crisis
  • Mohammad Yunus

संबंधित बातम्या

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत
1

Mustafizur Rahman: मुस्तफिजुरच्या ‘रिलीज’वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी; बांगलादेश सरकार कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त
2

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
3

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
4

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.