Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतासोबत मोठे युद्ध होणार नाही, पण…’ पाकिस्तानच्या माजी NSAने का केला असा दावा?

Former Pakistan NSA statement : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला असताना, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद युसूफ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 09:11 AM
Former Pakistan NSA Moeed Yousuf's response is making headlines

Former Pakistan NSA Moeed Yousuf's response is making headlines

Follow Us
Follow Us:

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला असताना, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोईद युसूफ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मोठे युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, परंतु परिस्थिती अतिशय सावधगिरीची आणि अस्थिर आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह संपूर्ण राजकीय यंत्रणेला धक्का बसला आहे, असे मानले जात आहे.

पहलगाम हल्ल्याने उधळलेले संबंध

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने थेट पाकिस्तानवर आरोप करत त्याला जबाबदार धरले आहे. हा हल्ला झाल्यानंतर ११ दिवस उलटून गेले असले तरी सीमेवर तणाव कायम आहे. लष्करी चकमकींचे वातावरण निर्माण झाले असून, राजनैतिक पातळीवरही दोन्ही देशांमध्ये टोकाची कटुता जाणवत आहे. भारताच्या या प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानने आपला सहभाग नाकारत, अणुयुद्धाची अप्रत्यक्ष धमकी देणे सुरू ठेवले आहे, ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियात अस्वस्थता वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Laughter Day 2025: फक्त 60 मिनिटे हसल्याने होतात 400 कॅलरीज बर्न; जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

मोईद युसूफ यांचे अनुभवसंपन्न मत

मोईद युसूफ, हे इम्रान खान सरकारमध्ये पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांचा दक्षिण आशियातील धोरणात्मक अभ्यासावर विशेष अधिकार असून, त्यांनी याआधीही अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये संकट व्यवस्थापन यावर अनेक अभ्यास प्रकाशित केले आहेत. त्यांच्या “Broking Peace in Nuclear Environments” या पुस्तकाला जागतिक धोरणतज्ज्ञांनी विशेष मान्यता दिली आहे.

‘युद्ध होणार नाही, पण चूक नको’  इशारा दिला

अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत, युसूफ यांनी युद्ध होण्याच्या शक्यतेवर भाष्य करत सांगितले की, “माझ्या मते भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मोठ्या स्वरूपाचे युद्ध होणार नाही. मात्र, गैरसमजुतीतून निर्माण होणारी चूक ही युद्धाचा भडका उडवू शकते.” ते पुढे म्हणाले की, भारताकडून तात्काळ लष्करी कारवाई होणार नाही, पण भूतकाळात जसे अचानक निर्णय घेतले गेले तशी स्थिती पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे पाकिस्तानने सर्व परिस्थितीसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

अमेरिकेचे मौन  जागतिक निष्क्रियतेवर टीका

या संपूर्ण प्रकरणात अमेरिकेच्या भूमिकेबाबत युसूफ यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दोन्ही देश संकटातून बाहेर पडण्यासाठी तिसऱ्या देशावर – विशेषतः अमेरिकेवर अवलंबून राहिले आहेत, हीच सर्वात मोठी समस्या आहे. पण अमेरिकेने यावेळी निष्क्रिय भूमिका घेतली आहे, आणि भारताने जी रणनीती स्वीकारली आहे ती यावेळी परिणामकारक ठरत नाही, कारण यावेळी अमेरिका न्यायालयीन किंवा संतुलन राखणारा मध्यस्थ म्हणून पुढे आलेली नाही.

हे देखील वाचा : International Firefighters’ Day : कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक? वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी

पाकिस्तानची राजकीय अडचण

युसूफ यांचे वक्तव्य पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचा असा स्पष्ट इशारा आहे की, फक्त भारताच्या कारवाया नव्हे, तर पाकिस्ताननेही जागरूक राहणे गरजेचे आहे. यामुळे शाहबाज शरीफ सरकारवर अंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दबाव वाढू शकतो.

 सावध राहणे गरजेचे

मोईद युसूफ यांचे वक्तव्य हे केवळ एका माजी अधिकाऱ्याचे मत नसून, ते दक्षिण आशियातील संभाव्य युद्धजन्य वातावरणाबद्दल एक गंभीर इशारा आहे. त्यांनी दिलेला “युद्ध होणार नाही, पण धोका कायम” हा संदेश दोन्ही देशांच्या नेतृत्वाला अधिक जबाबदारीने वागण्याची जाणीव करून देणारा आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही संयम, संवाद आणि शांततेच्या मार्गाने पुढे जाणे हीच आजच्या काळाची गरज आहे.

Web Title: Former pakistan nsa moeed yousufs response is making headlines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
1

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना
2

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.