
S. Jaishankar and Ursula Von Der Leyen and Antonio Costa
दरम्यान भारत-EU व्यापार चर्चेपूर्वी उर्सुला वॉन डेरे लेयेन यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी भारतासोबतच्या भागीदारीचे वर्णन विभाजित जगासाठी आशेचा किरण म्हणून केले आहे. त्यांमी म्हटले की, भारत आणि युरोपने धोरणात्मक भागीदारीचा खुला मार्ग निवडला आहे. आम्ही जगाला दाखवून देऊ की, परस्पर सामंजस्य करारातूनही प्रगतीचा मार्ग शक्य आहे. उर्सुला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अशी पोस्ट केली आहे. तसेच अँटोनियो कोस्टा यांनी देखील भारताचे वर्णन एक महत्वपूर्ण भागीदार म्हणून केले आहे.
दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपियन नेत्यांची भेट घेतली आहे. युरोपियन नेत्यांचे स्वागत करत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणारी चर्चा भारत आणि युरोप संबंधासाठी एक ऐतिहासिक आणि नवा अध्याय असेल. जयशंकर यांनी म्हटले की, या भागीदारीमुळे केनळ व्यापारच नाही, तर सुरक्षा आणि जागितक नियमांवर आधारित व्यवस्थेला मजबूती मिळणार आहे.
यापूर्वी २० जानेवारी २०२६ रोजी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंच शिखर परिषदेत उर्सुला यांनी भारत आणि युरोपच्या काराराला Mother Of All Deals असे संबोधले आहे. या ऐतिहासिक करारामुळे दोन अब्ज लोकांसाठी बाजारपेठा खुल्या होणार आहेत. युरोपियन युनियन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युरोपीय बाजारपेठांमध्ये व्यापाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
I’m so glad to be in India today. India and Europe have made a clear choice. The choice of strategic partnership, dialogue and openness. Leveraging our complementary strengths. And building mutual resilience. We are showing a fractured world that another way is possible. pic.twitter.com/J04vNQbW30 — Ursula von der Leyen (@vonderleyen) January 25, 2026
India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता