Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या माजी PM ‘शरीफ’ यांनी रचला होता भारतावर हल्ल्याचा प्लॅन; त्यांच्याच मंत्र्याने केली पोलखोल

India-Pakistan Tension: पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताविरुद्धच्या हल्ल्याचा कट रचला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2025 | 08:16 PM
India-Pakistan Tension Former Pakistani PM Sharif had planned to attack India claim by pakistan minister ajma bukhari

India-Pakistan Tension Former Pakistani PM Sharif had planned to attack India claim by pakistan minister ajma bukhari

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर या मोहीमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान चवथाळला होता. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये पाकिस्तानला पराभव मिळाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले आणि त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम? पाकिस्तानी अर्थमंत्र्यांनी केला खुलासा, म्हणाले…

कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच..

दरम्यान १० मे रोजी दोन्ही देशांनी युद्धंबंदीवर चर्चा करुन शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच आहे. पाकिस्तान भारताच्या कडक कारवाईने देखील सुधारलेला नाही. दरम्यान पाकिस्तानकडून भारताला सिंधू जल करारावरुन धमक्या दिल्या जात आहे.

याच वेळी पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलास्याने मोठी खळबळ उडाली आहे. दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताविरुद्धच्या हल्ल्याचा कट रचला होता.

नवाज शरीफ यांच्या देखरेखेखाली आखण्यात आली योजना?

सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या एका वरिष्ठ नेत्यांना हा खुलासा केला आहे. पंजाब प्रांताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अजमा बुखारी यांनी बुधवारी (१४ मे) पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखाली भारताविरुद्धच्या हल्ल्याची योजना आखण्यात आली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, नवाज शरीफ फक्त बोलत नाहीत, तर करुन दाखवतात.

मंत्री अजमा बुखारी यांनी दावा केला आहे की, नवाज शरीफ यांनीच पाकिस्तानला अण्वस्त्रधारी देश बनवले आहे. नवाज यांनी भारताविरोधात संपूर्ण योजनेचा कट रचला आहे. नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी तीन वेळा निवडून आले होते. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. तसेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. यामुळे भारताविरुद्धच्या हल्ल्यात त्यांची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताचे पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर

भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २८ निरापराधांचा वळी गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोही राबवत पहलगामचा बदला घेतला. भारताने या मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमदील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. स्वत:ला दहशतवादाचा बळी समजून घेणाऱ्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधले आणि त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ला केला. परंतु बारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यासला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे अनेक लष्कीर तळे उद्ध्वस्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या हल्ल्यानंतर दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानातून गायब; ठार की फरार?

Web Title: India pakistan tension former pakistani pm sharif had planned to attack india claim by pakistan minister ajma bukhari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
1

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
2

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
3

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…
4

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.