
india uae relations jaishankar visit amjad taha slams pakistan energy security 2026
S Jaishankar UAE visit 2026 update : जागतिक राजकारणाच्या पटावर भारत आता एक महासत्ता म्हणून वेगाने उदयास येत आहे. नुकताच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा पार पडला आणि या दौऱ्याने संपूर्ण मध्य-पूर्वेत (Middle East) भारताची प्रतिमा एका ‘शूर आणि विश्वासू’ मित्राची बनली आहे. यूएईचे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक अमजद ताहा यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने आता जगभरात चर्चा सुरू केली आहे. ताहा यांच्या मते, भारत हा एक असा देश आहे ज्याला इस्लामिक जिहादी दहशतवादी घाबरतात आणि हाच भारत भविष्यात जगाला नवी दिशा दाखवेल.
गेल्या ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जवळपास बंद झाली आहे. यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशा संकटकाळी भारताने अत्यंत चाणाक्षपणे आपली ऊर्जा सुरक्षा जपण्यासाठी पावले उचलली आहेत. एस. जयशंकर यांनी अबू धाबीमध्ये यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीचा मुख्य उद्देश भारताचा तेल पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि उभय देशांमधील ‘सामरिक भागीदारी’ अधिक मजबूत करणे हा होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
अमजद ताहा यांनी केवळ भारताची प्रशंसाच केली नाही, तर पाकिस्तानचा खरा चेहराही जगासमोर आणला आहे. त्यांच्या मते, पाकिस्तान हा कधीही विश्वास ठेवण्याजोगा देश नाही. त्यांनी दावा केला की, पाकिस्तान एकीकडे आखाती देशांकडून मदत घेतो आणि दुसरीकडे इराणच्या दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देतो. “पाकिस्तानने इराणच्या आक्रमणाचा कधीही निषेध केला नाही. ते केवळ सौदी अरेबियासारख्या देशांकडून पैसे घेतात आणि त्यातील काही हिस्सा इराणला पुरवतात. हे म्हणजे दहशतवादाला दिलेली लाचच आहे,” अशा कडक शब्दांत ताहा यांनी पाकिस्तानवर प्रहार केला आहे.
Strengthening 🇮🇳 🇦🇪 Comprehensive Strategic Partnership. Highlights of my visit to the UAE. pic.twitter.com/vjmZmuZmEr — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 13, 2026
credit – social media and Twitter
ताहा यांनी पुढे नमूद केले की, भारत हा दहशतवादाशी कधीही तडजोड करत नाही, हीच बाब यूएईला भावली आहे. युएईदेखील दहशतवाद्यांशी वाटाघाटी करत नाही आणि याच समान विचारधारेमुळे भारत आणि यूएई आज नैसर्गिक मित्र बनले आहेत. एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने यूएईच्या नेतृत्वाचे आभार मानले आणि पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी यूएईने केलेल्या प्रयत्नांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Crimes : इस्रायलने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! चिमुकल्यांच्या रुग्णालयाची राखरांगोळी; इराणने जारी केला भयावह VIDEO
जेव्हा एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र आणि तिथले प्रभावशाली लोक भारताच्या बाजूने उभे राहतात आणि पाकिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्राला फटकारतात, तेव्हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय मानला जातो. जयशंकर यांच्या या दौऱ्याने हे सिद्ध केले आहे की, संकट कितीही मोठे असले तरी भारत आपल्या ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी जगातील कोणत्याही देशाशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधू शकतो. आज अरबी जगतात भारताचे नाव आदराने घेतले जात आहे, हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.