
indian coast guard day history significance vayam rakshamah 2026
Indian Coast Guard Day 2026 Marathi news : भारताच्या अथांग पसरलेल्या निळ्या समुद्राकडे आपण जेव्हा शांतपणे पाहतो, तेव्हा तिथल्या लाटांमध्ये आपल्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून तैनात असणाऱ्या एका दलाचा विसर पडता कामा नये, ते म्हणजे ‘भारतीय तटरक्षक दल’ (Indian Coast Guard). आज १ फेब्रुवारी! संपूर्ण देश भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहे. १९७७ मध्ये एका छोट्या तुकडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका शक्तिशाली आणि आधुनिक दलापर्यंत पोहोचला आहे.
१९७० च्या दशकात भारताच्या सागरी सीमांमधून मोठ्या प्रमाणात तस्करी (Smuggling) होत असे. तसेच शत्रू राष्ट्रांकडून सागरी मार्गाचा वापर करून घुसखोरी होण्याचा धोका होता. केवळ नौदलावर (Navy) संपूर्ण भार टाकणे कठीण होते. त्यामुळे समुद्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका स्वतंत्र दलाची आवश्यकता भासली. १८ ऑगस्ट १९७८ रोजी संसदेत ‘तटरक्षक अधिनियम’ संमत झाला आणि अधिकृतपणे हे दल संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य आहे ‘वयम रक्षाम:’ (We Protect). हे दल केवळ युद्धासाठी नसून शांततेच्या काळातही ते तितकेच सक्रिय असते. जेव्हा समुद्रात चक्रीवादळ येते किंवा मच्छिमारांची बोट भरकटते, तेव्हा सर्वात आधी मदतीला धावून येणारे हात म्हणजे तटरक्षक दल. गेल्या काही वर्षांत या दलाने हजारो मच्छिमारांचे प्राण वाचवले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ (Drugs) भारतात येण्यापासून रोखले आहेत.
The 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐂𝐨𝐚𝐬𝐭 𝐆𝐮𝐚𝐫𝐝 𝐰𝐢𝐥𝐥 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐦𝐨𝐫𝐚𝐭𝐞 𝐢𝐭𝐬 𝟓𝟎𝐭𝐡 𝐑𝐚𝐢𝐬𝐢𝐧𝐠 𝐃𝐚𝐲 𝐭𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰, marking nearly five decades of dedicated, selfless service to the nation. From its beginnings in 1977 with just seven surface platforms, the… pic.twitter.com/9j5SWmHu6Y — All India Radio News (@airnewsalerts) January 31, 2026
credit – social media and Twitter
आजच्या आधुनिक काळात केवळ शत्रूपासून रक्षण करणे पुरेसे नाही. समुद्रात होणारी ‘तेल गळती’ (Oil Spill) ही सागरी जीवांच्या नाशासाठी कारणीभूत ठरू शकते. भारतीय तटरक्षक दल अशा आपत्तीच्या वेळी तेल गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. तसेच सागरी प्रदूषणापासून किनारपट्टीचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारीही हे दल यशस्वीपणे पार पाडत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती
आज भारतीय तटरक्षक दलाकडे १५० पेक्षा जास्त जहाजे आणि ७० पेक्षा जास्त विमाने-हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीच्या प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा (ALH MK-III) समावेश आहे. यामुळे खोल समुद्रात जाऊन टेहळणी करणे आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत आता जास्तीत जास्त जहाजे भारतातच तयार केली जात आहेत, ज्यामुळे हे दल अधिक स्वावलंबी झाले आहे.
Ans: भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १ फेब्रुवारी १९७७ रोजी झाली आणि अधिकृत घोषणा १८ ऑगस्ट १९७८ रोजी करण्यात आली.
Ans: सागरी सीमांचे रक्षण करणे, तस्करी रोखणे, सागरी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि मच्छिमारांना संकटकाळी मदत करणे हे या दलाचे मुख्य कार्य आहे.
Ans: भारतीय तटरक्षक दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत कार्य करते.