Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे जेम्स बाँड अजित डोवाल यांनी पाकिस्तानमधून सरकारला पाठवली होती ‘त्यांची’ गुप्त माहिती; वाचा ‘ही’ चित्तथरारक कहाणी

Nsa Ajit Doval: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या कारकिर्दीत 30 वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले आहे. एकदा त्याने पाकिस्तानच्या अणुचाचणीची माहिती भारताला दिली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 22, 2025 | 08:30 PM
India's James Bond Ajit Doval sent the plan to the government from Pakistan

India's James Bond Ajit Doval sent the plan to the government from Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

India’s James Bond Ajit Doval : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे नाव देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांची कारकीर्द इतकी धाडसी आणि थरारक आहे की त्यांना ‘भारताचे जेम्स बाँड’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्ता, धोरणात्मक नजर आणि आत्मबलिदानाच्या वृत्तीमुळे त्यांनी भारताच्या सुरक्षेच्या पायाभूत पातळीवर अभूतपूर्व योगदान दिले आहे. अजित डोवाल यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या सेवा काळात तब्बल ३० वर्षे गुप्तहेर म्हणून काम केले आहे. यामध्ये त्यांनी अनेक मिशन पार पाडले, पण सर्वांत उल्लेखनीय आहे ते पाकिस्तानच्या अणुचाचणीचा पर्दाफाश करणारे मिशन, जे त्यांनी जीव धोक्यात घालून यशस्वी केले.

१९७२ : अणुचाचणीमुळे पाकिस्तान अस्वस्थ

१९७२ साली भारताने पहिली अणुचाचणी केली, आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. भारताच्या शास्त्रीय आणि सामरिक प्रगतीमुळे पाकिस्तानने तात्काळ अणुयोजना सुरू केली. त्यांनी फ्रान्स, चीन आणि उत्तर कोरियाकडून तांत्रिक मदत मागितली. फ्रान्सने त्यांच्या उद्दिष्टांमध्ये राजकीय हेतू असल्याचे ओळखून माघार घेतली, पण चीन आणि उत्तर कोरियाने पाकिस्तानला साथ दिली.

पाकिस्तानच्या कहुटा शहरामध्ये एक संशोधन केंद्र उभारले गेले, जिथे अणुचाचणीसाठी तयारी सुरू होती. ही माहिती भारतापर्यंत पोहोचत होती, पण कोणतेही ठोस पुरावे नव्हते. त्या वेळी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांनी गुप्तचर यंत्रणा सतर्क केली, आणि याच वेळी डोवाल या मोहिमेसाठी पाकिस्तानात गेले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या बिलावल भुट्टोची चांगलीच तंतरली; म्हणाला, ‘अणु हल्ल्याचा परिणाम…’

डोवालचा गुप्त शिरकाव, भीक मागणाऱ्या चेहऱ्यामागे धाडसी गुप्तहेर

अजित डोवाल यांनी पाकिस्तानात प्रवेश करून कहुटा संशोधन केंद्राजवळ भिकारीच्या वेशात बसणे सुरू केले. त्यांचे मिशन होते – संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या अणुकार्याची ठोस माहिती मिळवणे. त्यांनी शास्त्रज्ञ ज्या सलूनमध्ये केस कापायला जात होते ते शोधले आणि त्या दुकानाबाहेर बसून शास्त्रज्ञांचे केस गुप्तपणे गोळा केले. नंतर हे केस भारतात आणून प्रयोगशाळेत तपासण्यात आले. या केसांमधून अणू विकिरणाचे स्पष्ट पुरावे सापडले, ज्यामुळे हे सिद्ध झाले की कहुटामध्ये अणुचाचणीची तयारी सुरू आहे. हे भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी एक मोठे यश होते.

पाकिस्तान गोंधळला, योजना पुढे ढकलली

जेव्हा पाकिस्तानला समजले की त्यांची गुप्त योजना फोडली गेली आहे, त्यांनी गुप्तहेर शोध मोहिम राबवली आणि काही भारतीय एजंट्सला ठार केले. मात्र, अजित डोवाल यशस्वीरित्या तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या या मिशनमुळे पाकिस्तानची अणुचाचणी योजना अनेक वर्षे पुढे ढकलली गेली. ही माहिती भारतीय सरकारसाठी अत्यंत मोलाची ठरली. पाकिस्तानच्या अणुयोजनेंवर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले आणि भविष्यातील धोका काही काळ टाळण्यात मदत झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगात सर्व शक्तिशाली असलेल्या अमेरिकेच्या ‘Minuteman-III’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाहा ‘हा’ चित्तथरारक VIDEO

अजित डोवाल, भारताच्या सुरक्षिततेचा धैर्यशील शिल्पकार

आज जेव्हा भारताची सुरक्षा नीती आखली जाते, तेव्हा अजित डोवाल यांचा आवाज निर्णायक असतो. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा उपयोग करून सरकारने अनेक वेळा देशविरोधी शक्तींना योग्य प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या साहसिकतेने भारताचे संरक्षण भक्कम केले आहे. ‘गुप्तहेर’ ही संज्ञा सामान्य लोकांना अदृश्य वाटते, पण अजित डोवाल यांच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळेच आज भारत अधिक सुरक्षित आहे. त्यांची ही कहाणी एकदा पुन्हा दाखवते की, खऱ्या युद्धात शस्त्रांपेक्षा अधिक प्रभावी असते ती माहिती आणि धैर्य!

Web Title: Indias james bond ajit doval sent the plan to the government from pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Ajit Doval news
  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war

संबंधित बातम्या

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच
1

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
2

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.