Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

S. Jaishankar On Pok: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ‘काश्मीर वादावर’ मोठं विधान; म्हणाले, “POK ताब्यात…”

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी "राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड" या लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि काश्मीरशी संबंधित विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2025 | 11:18 AM
Jaishankar said India is ready to reclaim Pakistan-occupied Kashmir

Jaishankar said India is ready to reclaim Pakistan-occupied Kashmir

Follow Us
Close
Follow Us:

लंडन – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड” या लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि काश्मीरशी संबंधित विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत आता फक्त PoK परत मिळण्याची प्रतीक्षा करत आहे, जो पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला आहे.

काश्मीरमधील महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रगती

परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत सरकारने काश्मीरच्या विकासासाठी आणि स्थैर्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. कलम 370 हटवणे, आर्थिक वाढीला चालना देणे, स्थानिक निवडणुका घेणे आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे ही त्यातील प्रमुख पावले आहेत. काश्मीरच्या विकासाबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, “सरकारने बहुतेक समस्या सोडवण्यामध्ये प्रशंसनीय काम केले आहे आणि कलम 370 हटवणे हा यामधील मोठा निर्णय होता.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीरमध्ये निवडणुका होणे आणि मोठ्या प्रमाणावर मतदान होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मेरा इंतकाम देखेगी… 1200 च्या स्पीडने गाडी चालवत गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला आणि लावली आग

PoK परत मिळवणेच अंतिम उद्दिष्ट

पाकव्याप्त काश्मीरबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “काश्मीरचा प्रश्न भारतात सामील होताच संपतो. काश्मीरचा संपूर्ण प्रश्न सोडवायचा असेल, तर PoK परत मिळवणे गरजेचे आहे.” त्यांच्या या वक्तव्यावरून भारत सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचा पुनरुच्चार झाला आहे. जयशंकर यांनी याआधी 9 मे 2024 रोजीही स्पष्ट केले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कटिबद्ध आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले होते की, 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर लोक PoK बाबत अधिक गंभीरपणे विचार करू लागले आहेत.

ते पुढे म्हणाले, “कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्याआधी विचारपूर्वक आणि धोरणात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. त्यामुळे भारत सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.”

Appreciated the conversation with @bronwenmaddox at @ChathamHouse this evening.

Spoke about changing geopolitics, geoeconomics, India-UK ties, neighbourhood and the Indian view of the world.

Do watch 🎥: https://t.co/Wp6CwLBtxY pic.twitter.com/0SSf1E7WuF

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 5, 2025

credit : social media

भारत-चीन संबंधांवर परराष्ट्र मंत्र्यांचे मत

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले. त्यांनी नमूद केले की, “भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा आकडा एक अब्जाहून अधिक आहे आणि त्यांचा इतिहासही प्राचीन आणि गुंतागुंतीचा आहे. आज दोन्ही देश वेगाने प्रगती करत आहेत आणि एकमेकांचे शेजारी आहेत.” या संबंधांच्या गुंतागुंतीबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “जेव्हा एखादा देश वेगाने प्रगती करतो, तेव्हा त्याचे शेजारी आणि जागतिक संबंधांतील संतुलन बदलते. अशा स्थितीत भारत आणि चीन यांच्यात सहकार्य आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : लंडनमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ल्याचा प्रयत्न; पाहा Video

भारताची PoK बाबत भूमिका स्पष्ट

परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यांमुळे भारताची PoK बाबतची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. सरकार यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही आणि योग्य वेळी योग्य पावले उचलली जातील, असे संकेत त्यांनी दिले. भारत सरकारने गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये स्थैर्य आणि विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे हा प्रश्न अधिक सुटसुटीत होत आहे. भारताच्या सामरिक धोरणात PoK हा एक महत्त्वाचा मुद्दा असून, भविष्यात भारत सरकार या दिशेने कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Jaishankar said india is ready to reclaim pakistan occupied kashmir nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • London
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.