Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSB Alert : India-Nepal सीमेवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; घुसखोरांना रोखण्यासाठी दोन्ही देशाने घेतला ‘हा’ कठोर निर्णय

India Nepal border : अलिकडच्या काही महिन्यांत भारत-नेपाळ सीमेवरून तिसऱ्या देशातील नागरिकांची, विशेषतः पाकिस्तान, चीन आणि ब्रिटनमधील घुसखोरीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 03, 2025 | 04:35 PM
India and Nepal tighten border security after third-country arrests

India and Nepal tighten border security after third-country arrests

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत–नेपाळ खुल्या सीमेचा गैरफायदा घेत तिसऱ्या देशांचे नागरिक बेकायदेशीर प्रवेश करत असल्याने सुरक्षा चिंता तीव्र झाली आहे.
  • संयुक्त पाळत, गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.
  • व्हिसा व पासपोर्टशिवाय प्रवेश केल्यास भारत व नेपाळमध्ये कठोर कारावास व दंडाची तरतूद लागू राहील.

India Nepal border security : भारत–नेपाळ (India-Nepal) ही सुमारे १,८८० किलोमीटर लांबीची खुली सीमा केवळ व्यापार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठीच नाही, तर अनेक वर्षांपासून सामाजिक आणि आर्थिक नात्यांचे प्रतीक राहिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत या खुल्या सीमेचा गैरवापर करून काही परदेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः पाकिस्तान, चीन आणि ब्रिटनशी संबंधित काही नागरिक नेपाळमार्गे भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळल्यानंतर, दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळने सीमा सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. संयुक्त पाळत ठेवणे, अधिक चौक्या सक्रिय करणे, गुप्तचर माहिती जलदगतीने शेअर करणे आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करणे, असा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट संकेत दोन्ही देशांनी दिला आहे.

१५ नोव्हेंबर रोजी विशेष सुरक्षा दलाने (SSB) नेपाळ सीमेवरून दोन ब्रिटिश नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी एक व्यक्ती पाकिस्तानी वंशाचा असल्याचे तपासात समोर आले. तसेच, काही चिनी नागरिक देखील नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या घटनांमुळे सीमा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला

भारतीय कायद्यानुसार, कोणताही परदेशी नागरिक व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करत असेल, तर त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹५,००,००० पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. नुकतेच बहराइच येथे अटक करण्यात आलेल्या एका चिनी महिलेला न्यायालयाने आठ वर्षांचा तुरुंगवास आणि ₹५०,००० दंड ठोठावला आहे. यामुळे भारत सरकार या प्रकरणांकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे अधोरेखित झाले आहे.

🚨 BIG! A Chinese national was ARRESTED at the Indo-Nepal border with a Pakistani visa, while trying to enter India ILLEGALLY. 👉 SSB detained him during checking — He was carrying multiple passports, phones, and documents from China, Pakistan, Nepal & Vietnam. pic.twitter.com/ZWcjr9ogNq — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 25, 2025

credit : social media and Twitter 

नेपाळमध्येही नियम कडक आहेत. इमिग्रेशन कायदा २०४९ नुसार, विनाअनुमती देशात प्रवेश केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ₹५०,००० पर्यंत दंडाची तरतूद आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे संयुक्त प्रवक्ते रवींद्र आचार्य यांनी सांगितले की, दोन्ही देश संयुक्तरित्या सीमा पाळत वाढवणार असून, सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर माहिती संकलनासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

नैसर्गिक दृष्ट्या मैत्रीपूर्ण आणि खुली असलेली ही सीमा आता ड्रग्ज तस्करी, मानवी तस्करी, बनावट कागदपत्रे आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या नेटवर्कसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. त्यामुळेच ‘खुली सीमा, पण कडक नजर’ हे नवीन धोरण उघडपणे स्वीकारण्यात आले आहे. २५० हून अधिक चौक्यांवर सुमारे ९,००० पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीमा निरीक्षण करण्यात येणार आहे. भारत-नेपाळमधील दीर्घकालीन मैत्री अबाधित राहील, मात्र सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही शिथिलता ठेवली जाणार नाही, हे या निर्णयातून स्पष्ट होते. आगामी काळात या संयुक्त उपाययोजनांमुळे सीमा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुस्थितीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत–नेपाळने कडक पावले का उचलली?

    Ans: वाढत्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे.

  • Que: व्हिसाशिवाय भारतात प्रवेश केल्यास काय शिक्षा?

    Ans: ५ वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड.

  • Que: सीमेवर नवी व्यवस्था काय असेल?

    Ans: संयुक्त पाळत, रेकॉर्ड ठेवणे आणि जलद गुप्तचर शेअरिंग.

Web Title: Nepal and india take a big decision to prevent infiltrators from crossing the border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • india
  • India Nepal Border
  • International Political news
  • nepal

संबंधित बातम्या

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?
1

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर.. 
2

Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर.. 

US Travel Ban : 30 हून अधिक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास घालण्यात येणार बंदी; लवकरच Donald Trump जाहीर करणार यादी
3

US Travel Ban : 30 हून अधिक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास घालण्यात येणार बंदी; लवकरच Donald Trump जाहीर करणार यादी

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo
4

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.